उन्हाळ्यातील उकाड्यावर रामबाण उपाय! शरीराला ताजेतवानेपणा आणि नैसर्गिक ऊर्जा देण्यासाठी घरीच बनवा नारळ शिकंजी
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाली आहे. कडक उन्हात बाहेर जाऊन आल्यानंतर अंगाची काहिली होते. खूप जास्त गरम झाल्यानंतर काहींना काही थंड पिण्याची सगळ्यांचं इच्छा होते. बाहेरून जाऊन आल्यानंतर अनेक लोक थंड पाणी पितात. पण सतत थंड पाणी प्यायल्यामुळे सर्दी खोकला होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वेगवेगळ्या फळांचा रस आणि शिकंजी सरबत बनवून प्यावे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये नारळ शिकंजी बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. नारळ पाणी उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये प्यायले जाते. नारळ पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहते. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. उन्हाळ्यात अल्कोहोलिक ड्रिंक्सचे सेवन करण्याऐवजी घरी बनवलेल्या पेयांचे सेवन करावे. या पेयांच्या सेवनामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते आणि अशक्तपणा येत नाही. तसेच उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवत नाही. चला तर जाणून घेऊया नारळ शिकंजी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)






