मासिक पाळीच्या रक्तामुळे कोणते आजार वाढतात? संसर्गापासून बचाव करण्यासाठी 'या' पद्धतीने घ्या शरीराची काळजी
मासिक पाळीच्या रक्तात कोणते विषाणू असतात?
पाळीच्या दिवसांमध्ये शरीराची कशी काळजी घ्यावी?
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये उद्भवणाऱ्या समस्या?
प्रत्येक महिन्यातील चार किंवा पाच दिवस मासिक पाळी येणे हे स्त्रियांच्या शरीरातील नैसर्गिक चक्र आहे. वयाच्या १२ किंवा १३ व्या वर्षांपासून मासिक पाळी येण्यास सुरुवात होते. या दिवसांमध्ये महिलांना शारीरिक तसेच मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. दर महिन्याला गर्भाशयाचे अस्तर गळून पडते आणि योनीमार्गाद्वारे रक्तस्त्राव होतो. या प्रक्रियेदरम्यान महिलांना शारीरिक त्रासांना सामोरे जावे लागते. अतिप्रमाणात रक्तस्त्राव होणे, कंबर दुखणे, पाठ दुखणे, पेटके येणे, उलट्या, मळमळ इत्यादी समस्या उद्भवतात. मासिक पाळीचे चक्र साधारणता २८ दिवसांचे असते. पण जीवनशैलीतील चुका आणि शरीरसंबंधित आजारामुळे चक्रात बदल होण्याची जास्त शक्यता असते. अतिप्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे अशक्तपणा आणि थकवा येऊन आरोग्य बिघडते. आज आम्ही तुम्हाला मासिक पाळीच्या रक्तात कोणते विषाणू आढळतात? संसर्गापासून बचाव करण्यासाठी शरीराची कशी काळजी घ्यावी, जाणून घ्या सविस्तर.(फोटो सौजन्य – istock)
मासिक पाळीच्या रक्तात एचआयव्ही (HIV), हिपॅटायटीस बी (HBV) आणि हिपॅटायटीस सी यांसारखे गंभीर विषाणू असतात. पाळीच्या दिवसांमध्ये शरीरातून बाहेर पडणाऱ्या रक्तामध्ये असंख्य धोकादायक विषाणू आढळून येतात. त्यामुळे पाळी आल्यानंतर योग्य स्वच्छ राखणे आणि सुरक्षितता बाळगणे फार आवश्यक आहे. तसेच रक्ताव्यतिरिक्त, योनीमार्गातील जीवाणू आणि काही वेळा यीस्ट संसर्ग सुद्धा होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे मासिक पाळीच्या दिवसांमध्ये शरीराची खूप जास्त काळजी घ्यावी.
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास शरीराला गंभीर आजाराची लागण होते. त्वचा संसर्ग होऊन रॅश येणे, त्वचा लाल पडणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे या दिवसांमध्ये कॉटनच्या अंतर्वस्त्रांचा वापर करावा. याशिवाय आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळे, कडधान्ये आणि सुका मेव्याचे सेवन करावे. पाळी आल्यानंतर दर ४ ते ५ तासांनी पॅड बदलते राहावे.यामुळे बॅक्टेरियाची वाढ होत नाही. तसेच नाजूक अवयव दिवसभरातून तीनदा किंवा चार वेळा कोमट पाण्याने स्वच्छ करून घ्यावे.
मासिक पाळी आल्यानंतर दिवसातून दोन वेळा अंघोळ करावी. अंघोळ केल्यामुळे शरीर स्वच्छ होते. वापरलेले पॅड पेपरमध्ये गुंडाळून कचऱ्याच्या डब्यात टाकावे. उघड्यावर पॅड कुठेही टाकू नये. यामुळे संसर्ग झपाट्याने पसरतो. पाळी आल्यानंतर चहाचे सेवन करण्याऐवजी कॉफी किंवा आल्याचा चहा प्यावा. यामुळे स्नायूंवर वाढलेला तणाव कमी होतो. नाजूक अवयव स्वच्छ करताना साबणाचा वापर करू नये. साबणाच्या वापरामुळे रॅश किंवा फंगल इन्फेक्शन होऊ शकते.
Ans: साधारणपणे, एका चक्रात ३०-८० मिलीलीटर रक्तस्त्राव होणे सामान्य मानले जाते.
Ans: सॅनिटरी पॅड, टॅम्पन्स किंवा मेंस्ट्रुअल कपचा वापर करावा. पॅड दर ४-६ तासांनी बदलणे आवश्यक आहे, ज्यामुळे इन्फेक्शन टाळता येईल.
Ans: होय, हलका व्यायाम जसे की चालणे किंवा योगासने केल्याने पाळीच्या वेदना कमी होण्यास मदत होते, परंतु जड व्यायाम टाळावा.






