Yoga: सकाळची सुरुवात योगाने करा; शरीर आणि मनाला मिळतील ‘हे’ जबरदस्त फायदे
मान्सूनमध्ये मनाली परिसरात मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि रस्ते बंद होण्याच्या घटना वारंवार घडतात. बियास नदीलगतचा परिसर तसेच मनाली-लेह महामार्गावर वाहतूक विस्कळीत होण्याचा धोका असतो. त्यामुळे या काळात अनावश्यक प्रवास टाळणे अधिक सुरक्षित ठरते.
चारधाम यात्रेचे मार्ग उंच डोंगराळ भागातून जात असल्याने मुसळधार पावसात भूस्खलन, दगड कोसळणे आणि नद्यांच्या पाणीपातळीत अचानक वाढ होण्याचा धोका कायम असतो. त्यामुळे प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
पावसाळ्यात लोणावळा-खंडाळा परिसर निसर्गसौंदर्याने खुलतो. मात्र, घाटरस्त्यांवर भूस्खलन, दगड कोसळणे, पाणी साचणे आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी यामुळे प्रवास धोकादायक ठरू शकतो.
पावसाळ्यात केरळला प्रवास करणे टाळावे. वायनाडमधील पेरियार आणि पंबा नद्यांना विशेषतः पूर येण्याची शक्यता असते. भरतपुझा आणि काबिनीसारख्या नद्यांनाही पावसाळ्यात पूर येतो, त्यामुळे तुम्ही हा परिसर टाळावा. केरळच्या सखल भागांमध्ये जवळपास दरवर्षी पूर येतो.
मेघालय आणि ईशान्येकडील काही डोंगराळ भागांत अतिवृष्टीमुळे भूस्खलनाच्या घटना वाढतात. अनेक रस्ते तात्पुरते बंद होतात, त्यामुळे पर्यटकांनी हवामानाचा अंदाज आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचना तपासूनच प्रवास करावा.
प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी हवामानाचा ताजा अंदाज तपासा, आवश्यक असल्यास सहल पुढे ढकला आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी पर्यायी योजना तयार ठेवा. स्थानिक प्रशासनाने रेड किंवा ऑरेंज अलर्ट जारी केल्यास पर्यटन टाळणे हाच सर्वात सुरक्षित पर्याय ठरतो. सुरक्षित प्रवासासाठी हवामानाच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका.
एक रुपयाही खर्च न करता घरच्या घरी मिळवा पार्लरसारखा ग्लो; हळदीचे ‘हे’ फेस पॅक नक्की करा ट्राय






