कर्करोगाविरुद्ध तीन स्तरांवरील प्रभावी उपचार पद्धती; शस्त्रक्रिया, केमोथेरपीद्वारे रुग्णांना नवजीवन देणारी आधुनिक वैद्यकीय क्रांती
कर्करोगाच्या उपचारासाठी तीन स्तरावर उपचार पद्धती! राज्यात सर्व प्रकारच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. कर्करोगाच्या तातडीने निदानासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये तपासणी करण्यात येत आहे. तपासणीसाठी नागरिकांमध्ये जागृती वाढविण्यात येत असून नागरिकांनी या तपासणीसाठी पुढे यावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. तालुका, जिल्हा आणि राज्यस्तर अशा तीन स्तरावर उपचार पद्धती राबवून जागृती, तपासणी आणि उपचार यावर भर दिला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. कर्करोग तपासणीसाठी राज्यात सध्या आठ वाहने असून यांची संख्या वाढवून सर्व जिल्ह्यांमध्ये वाहने उपलब्ध करुन दिली जातील, असे त्यांनी सांगितले. महिलांमधील स्तनाच्या कर्करोगासंदर्भातील तपासणीवर भर देण्यात येत असून याअंतर्गत ३ कोटी २० लाख महिलांची तपासणी करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. कर्करोगावर उपाययोजना करण्यासंदर्भात सुनील प्रभू यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.(फोटो सौजन्य – istock)
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, तालुका, जिल्हा आणि राज्यस्तर अशा तीन स्तरावर उपचार पद्धती राबवून जागृती, तपासणी आणि उपचार यावर भर दिला जात आहे.
२६ ठिकाणी पीपीपी तत्वावर रेडिओथेरपीचे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या वतीने ९ ते १३ वर्ष वयोगटातील मुलींच्या तपासणीची मोहीम देशभरात सुरू होणार असून त्यांचे लसीकरण देखील करण्यात येईल.
मुंबईत कर्करोगाच्या तपासणी आणि उपचाराबाबत महानगरपालिका आयुक्तांसोबत बैठक घेण्यात येईल. कोकणामध्ये कर्करोगाच्या तपासणीसाठी केंद्र सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. तसेच कर्करोगाच्या औषधांच्या किंमतीसंदर्भात कंपन्यांसोबत चर्चा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
पुरूषांनो सावधान! निरोगी असूनही वाढत्या वयात कमी होते Fertility, काय आहे कारण
कॅन्सरसारख्या गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये दिसून येणाऱ्या अतिशय सामान्य पण गंभीर लक्षणांकडे अजिबात लक्ष दिले जात नाही. पण कालांतराने हा आजार गंभीर रूप घेतो आणि संपूर्ण आरोग्याचे नुकसान करतो. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे योग्य वेळी लक्ष देऊन विविध चाचण्या कराव्यात. दुर्लक्ष केल्यामुळे कॅन्सरच्या पेशी संपूर्ण शरीरात पसरतात, ज्याच्या परिणामामुळे शरीरात थकवा, अशक्तपणा वाढतो.






