औरंगाबाद : काही दिवसांपुर्वी कृषी मंत्री अब्दुल सत्तारांचं नाव टिईटी घोटाळ्या प्रकरणी चर्चेत आलं होतं. त्यांच्या मुलींची नाव या घोटाळ्यात आली होती. आता पुन्हा एकदा अब्दुल सत्तारांचं नाव चर्चेत आहे. आता निवडणूक प्रतिज्ञापत्रावरुन त्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश आदेश पोलिसांना दिले आहेत. पोलिसांना सखोल चौकशी करून 60 दिवसात अहवाल द्यावा लागणार आहे.
[read_also content=”‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’वर आज ट्रॅफिक ब्लॉक; दोन तास वाहतूक बंद https://www.navarashtra.com/maharashtra/traffic-block-on-mumbai-pune-expressway-today-so-stopped-traffic-for-two-hours-nrgm-319459.html”]
टीईटी प्रकरणानंतर कृषी मंत्री अब्दुल सत्तारांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. निवडणूक प्रतिज्ञापत्रावरुन त्याचं नाव समोर आलं आहे. सिल्लोडमधील महेश शंकरपेल्ली आणि पुण्यातील डॉ अभिषेक हरिदास यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि इतर विरोधात तक्रार दाखल केली होती. सत्तार यांनी निवडणुकीवेळी दिलेल्या शपथ पत्रात शेतजमीन, बिगरशेती जमीन, वाणिज्य इमारती, निवासी इमारती, शैक्षणिक अहर्तेबाबत तफावत असलेली माहिती सादर केली होती. या बाबत अभ्यास करून महेश शंकरपेल्ली आणि डॉ अभिषेक हरिदास यांनी केस दाखल केली.
[read_also content=”इगतपुरीजवळ भीषण अपघात; एकाचा मृत्यू, पाच जण जखमी https://www.navarashtra.com/maharashtra/accident-near-igatpuri-in-nashik-one-died-and-5-injured-nrps-319493.html”]
त्यानुसार, सिल्लोड न्यायालयाने पोलिसांना सी.आर.पी.सी 202 अंतर्गत तपासाचे आदेश दिले होते. सदर आदेशानुसार पोलिसांनी अहवाल देखील सादर केला होता. परंतु पोलिसांनी भ्रामक, त्रुटीयुक्त अहवाल देऊन अभय दिले असल्या बाबत फिर्यादींनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. सिल्लोड न्यायालयाने पोलिसांना पुनश्च सखोल चौकशी करून 60 दिवसात अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.