विदर्भावर सूर्य कोपला; अकोला @४६.९ (संग्रहित फोटो)
अकोला : राज्यभर उष्णतेचा पारा प्रचंड वाढताना दिसत आहे. विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा चांगलाच बसत आहे. दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडत आहेत. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, रविवारी अकोला येथे ४६.९ अंश तापमानाची नोंद झाली, जे राज्यातील सर्वांत उष्ण ठिकाण ठरले. भंडारा ४४.०, गोंदिया ४४.४, गडचिरोली ४४.६, ब्रह्मपुरी ४४.२ आणि वाशिम ४४.६ येथेही तीव्र उष्णतेचा परिणाम जाणवला.
मुंबईतही उन्हाचा तडाखा वाढला आहे. मुंबईसह लगतच्या जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. जळगावातही तापमान ४३ अंशांच्या पुढे गेल्याने महानगरपालिकेने शहरातील प्रमुख चौकांमध्ये टँकरद्वारे पाणी मारण्याची मोहीम राबवली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांतील स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. बहुतेक जिल्हा रुग्णालयांमध्ये कोल्ड वॉर्ड उभारण्यात आले आहेत.
Heat Wave : देशभरात तीव्र उष्णतेचा लाट अन् हवामानाचा इशारा, १३ राज्यांमध्ये हवामान बदलणार
दरम्यान, परभणीचे तापमान दोन दिवसांपासून ४२ अंशावर गेले आहे. यातच साडूला भेटण्यासाठी आलेल्या नाशिक येथील ३७ वर्षीय इसमाचा येथे उन्हाचा तडाखा बसल्याने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवाजी बबन कांबळे असे मृताचे नाव आहे. शिवाजी हे दिवसभर उन्हात फिरले. त्यातच त्यांना चक्कर आली आणि एका खड्यात पडले. शोधाशोध केल्यावर त्यांचा मृतदेहच हाती लागला. याप्रकरणी त्यांच्या भावाने नानलपेठ पोलिसांना माहिती दिली.
रात्रीच्या वेळीही उकाड्यापासून दिलासा नाहीच
२८% ते ६०% दरम्यान राहिले आहे. यामुळे हवेतील उकाडा वाढून उन्हाच्या झळा अधिकच बसू लागल्या आहेत. अनेक ठिकाणी रात्रीचे तापमान २४ ते ३० अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवले गेले. परिणामी, रात्रीच्या वेळीही नागरिकांना उष्म्यापासून दिलासा मिळू शकलेला नाही.
लहान मुलांचीही घ्या विशेष काळजी
लहान मुलांची शारीरिक प्रतिकारशक्ती कमी असते. तसेच त्यांची त्वचा अतिशय नाजूक असते. त्यामुळे उष्णतेमुळे त्यांना त्वचारोग, घामोळे, उष्माघात (हीट स्ट्रोक), तसेच शरीरातील पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. काही वेळा ही स्थिती गंभीर होऊ शकते, त्यामुळे पालकांनी विशेष सतर्कता बाळगणे गरजेचे आहे
काय घ्यावी खबरदारी…
– सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत अत्यावश्यक कामांशिवाय बाहेर पडू नका.
– भरपूर पाणी प्या, रसाळ फळांचे सेवन करा
– उष्णतेपासून बचावासाठी पूर्ण काळजी घ्या






