महापालिका निवडणूकीसाठी १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे.
Akola 108 Ambulance Record: अकोला जिल्ह्यात १०८ आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेने २५ ऑक्टोबरपर्यंत तब्बल १.९७ लाखांहून अधिक नागरिकांचे प्राण वाचवण्याचा विक्रमी टप्पा गाठला आहे.
Road Accident News: जानेवारी ते ऑक्टोबर २०२५ या १० महिन्यांत ३७३ अपघातांमध्ये १५७ जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यात ११८ प्राणघातक अपघातांचा समावेश आहे. गत तीन वर्षांत ६५३ जणांचा बळी गेला आहे.
संपूर्ण विदर्भातील प्रतिष्ठित ‘विश्वास करंडक’ बालनाट्य स्पर्धा ११ ते १३ डिसेंबर दरम्यान अकोल्यातील प्रमिलाताई ओक सभागृहात पार पडणार असून ३० शाळांची ३० नाटके सादर होणार आहेत.
नाफेड खरेदी केंद्रावर सोयाबीनसाठी असलेल्या कठीण अटींमुळे बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. तपासणीत सोयाबीन बसत नसल्याने शेतकऱ्यांवर शेतमाल परत नेण्याची वेळ आली आहे.
Akola Crime: अकोला पोलिसांनी 'ऑपरेशन प्रहार' अंतर्गत अवैध दारू विक्री विरोधात मोठी मोहीम यशस्वी केली. मागील ६ महिन्यांत हजाराहून अधिक कारवाया करत लाखोंचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.
पांढुर्णा तालुक्यातील चान्नी गावात गेल्या महिन्याभरापासून एअरटेलचे नेटवर्क पूर्णपणे ठप्प आहे. कासवगतीच्या इंटरनेटमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण व शेतकऱ्यांचे ई-पीक व्यवहार ठप्प झाले असून, नागरिक त्रस्त आहेत.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता यांनी रेल्वे सुरक्षेसाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ११ कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्काराने गौरव केले.
Missing Boy Akola: जिल्हा पोलिस अधीक्षकांनी मुलाला माध्यमांच्या उपस्थितीत पालकांच्या स्वाधीन केले आणि संपूर्ण कारवाईची माहिती दिली. यावेळी मुलगा आणि त्याच्या आईला अश्रू अनावर झाले.
अकोला जिल्ह्यात पुरुष नसबंदीची संख्या सलग तीन वर्षांपासून घटली. उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ ७६ पुरुषांचा सहभाग. कुटुंब नियोजन कार्यक्रमातील असमतोल चिंताजनक. डॉ. बळीराम गाढवे यांची प्रतिक्रिया.
बाळापूरच्या विद्यार्थ्यांची मोठी भरारी! जि.प. शाळा हाता येथील ५ विद्यार्थ्यांनी इस्रो विमान वारीच्या जिल्हास्तरीय निवड चाचणीत यश मिळवले. विमानाने इस्रोला भेट देण्याचा मान.
Akola Talathi Office Relocation: अकोला तहसील अंतर्गत १५ गावांचे तलाठी कार्यालय कोणतीही पूर्वसूचना न देता शहरात स्थलांतरित केल्याने ग्रामीण जनतेत तीव्र संताप आहे.