कोकणचा 'राजा' नैसर्गिक संकटात (फोटो- istockphoto)
रोगावर नियंत्रणासाठी कीटकनाशकांची फवारणी
अनिश्चितता राहिल्यास हापूसची चव सामान्यांसाठी महाग
हापूसला बदलत्या हवामानाचा फटका
गुहागर: कोकणचा राजा मानला जाणाऱ्या हापूस आंब्यावर यंदा निसर्गाची वक्रदृष्टी पडली असून, रत्नागिरीसह संपूर्ण किनारपट्टीवर बागायतदार हवालदिल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोकणातील हवामानात होणारे अनपेक्षित बदल कधी दाट धुके, कधी कडक ऊन तर कधी अवकाळी पाऊस यामुळे आंब्याच्या प्रादुर्भाव झाला आहे. आंबा उत्पादक मोहोरावर बुरशीजन्य रोगाचा मोठा शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.
रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांत हीच भीषण परिस्थिती पाहायला मिळत आहे. विशेषतः रत्नागिरीतील नाचणे सारख्या भागात बागांमधील मोहोर अक्षरशः काळा पडला आहे. यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीला पहिल्या टप्प्यात मोहोर अपेक्षेप्रमाणे आलाच नव्हता. त्यानंतर मोठ्या आशेने दुसऱ्या टप्प्यातील मोहोराची प्रतीक्षा शेतकऱ्यांना होती; मात्र आता हा मोहोरही बुरशीमुळे करपून गेल्याने बागायतदारांच्या चिंतेत भर पडली आहे. सातत्याने बदलणाऱ्या हवामानामुळे रोगाचा प्रादुर्भाव इतका वाढला आहे की, अनेक ठिकाणी मोहोर पूर्णपणे गळून पडत आहे. हे संकट निवारण्यासाठी शेतकरी सध्या बागांमध्ये दिवसरात्र राबताना दिसत आहेत.
कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या हापूस आंब्याला बसलेला हा फटका केवळ शेतक-यांचेच नव्हे, तर या क्षेत्रावर अवलंबून असलेल्या हजारो मजुरांचे आणि व्यापाऱ्यांचेही नुकसान करणारा ठरणार आहे. जर हवामानातील ही अनिश्चितता अशीच राहिली, तर यंदा हापूसची चव चाखणे सामान्यांसाठी महाग ठरेलच, पण बागायतदारांचे कंबरडे मात्र पूर्णपणे मोडेल.
Unseasonal Rain: अवकाळीमुळे ‘राजा’ संकटात; शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सिंधुदुर्गात बदलते हवामान व अवकाळी पावसामुळे आंबा व काजू पिकाला धोक्यात आले आहे. शासनाने अवकाळी पावसामुळे आणि बदलत्या हवामानामुळे काजू आंबा पिक बागायतदार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी पंचायत समिती सभापती जयप्रकाश चमणकर, पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर, माजी नगराध्यक्ष संदेश निकम यांच्यासह तालुक्यातील बागायतदार व व्यापारी प्रकाश विश्राम बोवलेकर, श्यामसुंदर राय यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांना निवेदन सादर केले.
आंबा-काजू हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश
कोकणचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हापूस आंब्यावर बंदा हवामानातील बदलाचा विपरीत परिणाम झाल्याचे चित्र शिरगाव परिसरात दिसून येत आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणावर आलेला मोहर बदललेल्या वातावरणामुळे करपून गळाल्याने बागायतदारांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. उशिरापर्यंत लांबलेल्या पावसाळ्यानंतर अचानक वाढलेली थंडी आणि किमान तापमानातील तीव्र घसरण यामुळे आंब्याच्या बहरावर प्रतिकूल परिणाम झाला.






