BEST कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपाचा इशारा; 15 ऑगस्टपर्यंत निर्णय न झाल्यास बेमुदत आंदोलन
मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या बेस्ट उपक्रमातील (BEST) कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाचा इशारा दिला आहे. बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने 15 ऑगस्टपर्यंत प्रमुख मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास बेमुदत संपावर जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यासंदर्भात समितीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
कृती समितीने 21 जून रोजी झालेल्या वेतन करारावर आक्षेप घेतला आहे. कर्मचाऱ्यांशी कोणतीही व्यापक चर्चा न करता हा करार करण्यात आल्याचा आरोप समितीने केला आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या आणि प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याचे समितीचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर वेतन कराराचा फेरविचार करून सर्व संबंधित संघटनांशी चर्चा करण्याची मागणी करण्यात आली आहे.
‘…हा प्रकल्प मुंबईसाठी महत्त्वाचा ठरणार’; ४५ कोटी देत असल्याची मंत्री आशिष शेलारांची माहिती
बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने सरकारसमोर पुढील प्रमुख मागण्या मांडल्या आहेत.






