File Photo : Eknath Shinde-Devendra Fadnavis
मुंबई : सिंचन प्रकल्प दीर्घकाळ रखडल्यावरुन कॅगचे जोरदार ताशेरे ओढले आहेत. वेळ आणि खर्चाचा अतिरेक टाळण्यासाठी कालबद्ध पद्धतीने काम करण्याची शिफारस देखील या रिपोर्टमधून करण्यात आली आहे. राज्यातील सहा सिचंन प्रकल्प पूर्ण करण्यासंदर्भात अक्षम्य दिरंगाई झाल्याप्रकरणी कॅगने आपल्या अहवालात ताशेरे ओढले आहेत. यातील चार प्रकल्प 11 ते 25 वर्षाच्या विलंबाने पूर्ण झाले, तर दोन प्रकल्प 20 वर्ष होऊनही पूर्ण झाले नसल्याचे कॅगने समोर आणले आहे. कॅगचा 2022 चा अहवाल शुक्रवारी विधानसभेत मांडण्यात आला.
सार्वजनिक पैशांचा समावेश असलेल्या कोणत्याही मोठ्या प्रकल्पासाठी खर्च अंदाजित रकमेच्या आत ठेवणे हे प्रकल्प व्यवस्थापनासमोरील प्रमुख आव्हान आहे. मात्र जटिल सिंचन प्रकल्पाच्या नियोजनातील अपुरेपणा किंवा अंमलबजावणीतील अकार्यक्षमतेमुळे खर्चात अनेक पटींनी वाढ होते. त्यामुळे प्रकल्प पूर्ण होण्यावर परिणाम होत असल्याचे कॅगने अहवालात म्हटले आहे.
कोणत्या प्रकल्पांवर कॅगचं बोट?