Chandrapur News: चंद्रपुरात मुसळधार पावसाचा कहर; 10 तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद, जनजीवन विस्कळीत
यावर्षी जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिना पूर्ण होत असतांनाही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतिक्षा होती. ती प्रतिक्षा बुधवारी रात्रीच्या सुमारास पडलेल्या पावसाने पूर्ण केली. बुधवारी पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल १० तालुक्यामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यात बल्लारपूर, गोंडपिपरी, ब्रह्मपुरी, राजुरा, कोरपना, जिवती, चंद्रपूर, सावली, सिंदेवाही, मूल या तालुक्यांचा समावेश आहे. बल्लारपूर तालुक्यामध्ये मागील २४ तासात १७८ मिमी एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झाली. तर त्या पाठोपाठ गोंडपिपरी १२२ मिमी, ब्रह्मपुरी १०३ तर राजूरा १००.९ मिमी पावसाची नोंद झालेली आहे.
यंदा सरासरीच्या केवळ ७२.९ टक्के पावसाची नोंद झालेली आहे. त्यापैकी बल्लारपुर तालुक्यामध्ये सरासरीच्या १५४.३ तर जिवती तालुक्यात १०७.५ एवढी सरासरीपेक्षा जास्त नोंद केल्या गेली आहे. आतापर्यंत राजूरा तालुक्यात सरासरीच्या केवळ ५५.४ टक्के एवढी कमी नोंद झालेली आहे. यावर्षी अल निनोचे सावट असल्यामुळे सुरूवातीला पावसामुळे खरीप हंगामावर मोठा परीणाम पडल्याचे दिसून आला. मात्र आता पडलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील शेतकामांना वेग आल्याचे चित्र जिल्ह्यात पहायला मिळत आहे. अतिवृष्टीमुळे काही भागातील पिकांचे नुकसान झालेले असले तरी आतापर्यंत पावसाची प्रतिक्षा करीत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसाने दिलासा मिळालेला आहे.
दुधातील भेसळीवर मुंढेंचा बुलडोझर? राज्यव्यापी कठोर कारवाई मोहीम हाती घेण्याची मागणी
चकजाटेपार येथील अंबादास ऋषी धनविजय यांच्या घराची भिंत कोसळल्याची घटना घडली. या घटनेत घराचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच संबंधित महसूल प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. नुकसानीचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला असून पुढील पंचनामा व शासकीय नियमानुसार मदतीची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.






