मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फोटो- सोशल मिडिया)
कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर – फडणवीस
जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे २९ व ३० मे रोजी आयोजन
दहा हजारांहून अधिक डेव्हलपर्स आणि तंत्रज्ञानप्रेमींची उपस्थिती अपेक्षित
मुंबई: कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे भविष्यातील परिवर्तनाचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात एआय स्वीकारण्याची आवश्यकता आहे. ‘मुंबई टेक वीक’सारख्या उपक्रमांमुळे एआयमधील संधी युवकांपर्यंत पोहोचतील आणि महाराष्ट्र देशातील एआय नवोन्मेषाचे अग्रगण्य केंद्र बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे ‘मुंबई टेक वीक (MTW) २०२६’ ची घोषणा केली. यावेळी ते बोलत होते. टेक एंटरप्रेन्योर्स असोसिएशन ऑफ मुंबई (टीम) तर्फे महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने, आयडीएफसी बँक आणि मेटा यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित हा कार्यक्रम दि. २९ आणि ३० मे रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे होणार आहे. ‘इंडिया : आय इन एक्शन’ या थीमअंतर्गत आयोजित ‘मुंबई टेक वीक २०२६’ मध्ये विविध क्षेत्रांतील एआयच्या प्रत्यक्ष वापराचे सादरीकरण होणार असून मेटा, एंथ्रॉपिक, ओपन एआय, गुगल क्लाऊड आणि नेसा यासारख्या कंपन्यांचा सहभाग असेल. यावेळी ‘मुंबई टेक वीक’ लोगोचे अनावरण करण्यात आले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शासन एआयचा विविध विभागांमध्ये वापर करीत आहे. एआयच्या माध्यमातून प्रशासन अधिक सक्षम आणि परिणामकारक होत आहे. शासन या परिवर्तनात सर्वात मोठा भागधारक म्हणून सक्रिय भूमिका बजावत आहे. ‘मुंबई टेक वीक’सारख्या व्यासपीठांमुळे एआयसंदर्भातील अनुभव लोकांपर्यंत अधिक व्यापक पातळीवर पोहोचतील, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी या कार्यक्रमात शासनाच्या एआय उपक्रमांचे अनुभवात्मक सादरीकरण करण्याची सूचनाही केली.
“महाराष्ट्र व दक्षिण कोरियात झालेल्या सामंजस्य…”; CM Devendra Fadnavis यांनी व्यक्त केले मत
टीमच्या वाढत्या विस्ताराचे कौतुक करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अधिकाधिक तरुण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक या उपक्रमाशी जोडले जात आहेत, ही सकारात्मक बाब आहे. महाराष्ट्र शासन एआय क्षेत्रातील नवोन्मेष आणि उद्योगवृद्धीसाठी सदैव तुमच्या पाठीशी उभे आहे. गेल्या वर्षापेक्षा अधिक भव्य आणि प्रभावी मुंबई टेक वीक आयोजित करूया आणि महाराष्ट्रातील युवकांना एआय क्षेत्रातील नव्या संधींशी जोडून त्यांना जागतिक पातळीवरील संधी उपलब्ध असेल.
“पुढील वर्षापासून ‘पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा…”; काय म्हणाले CM Devendra Fadnavis?
‘मुंबई टेक वीक’बाबत टीमचे सह अध्यक्ष आणि गव्हर्निंग कौन्सिल सदस्य हर्ष जैन म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहकार्य आणि ‘मुंबई टेक वीक’च्या संकल्पनेवरील त्यांच्या विश्वासाबद्दल आम्ही आभारी आहोत. एमटीयू २०२६ हे केवळ चर्चांपुरते मर्यादित न राहता उद्योगांचे स्वरूप कसे बदलत आहे आणि प्रत्यक्ष आर्थिक संधी कशा निर्माण करत आहे, हे दाखवण्यासाठी तयार करण्यात आले आहे आणि म्हणूनच मुंबई हे त्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. महाराष्ट्र शासन आमचा भागीदार असल्याने, मुंबई आणि महाराष्ट्राच्या एआय अर्थव्यवस्थेसाठी हा एक ऐतिहासिक टप्पा ठरवण्याची संधी आम्हाला मिळाली आहे.






