• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Congress Leader Nana Patole Has Asked A Question To The Mahayuti Government Nrdm

नाना पटोलेंचा महायुती सरकारला सवाल, म्हणाले; तुम्ही लाडक्या बहिणींना…

भाजपा युती सरकार लाभार्थी बहिणींची संख्या कमी करत आहे, असा हल्लाबोल ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 20, 2025 | 07:18 PM
नाना पटोलेंचा महायुती सरकारला सवाल, म्हणाले; तुम्ही लाडक्या बहिणींना...

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या निधीपैकी ४० टक्के निधी सुद्धा वापरला गेला नाही. सरकारने मते मिळवण्यासाठी अनेक घोषणा केल्या. लाडक्या बहिणींना भाजपा युती सरकार २१०० रुपये देणार होते पण आज सरकारला १०० दिवस उलटून अद्यापही ते पैसे लाडक्या बहिणींना मिळालेले नाहीत. उलट भाजपा युती सरकार लाभार्थी बहिणींची संख्या कमी करत आहे, असा हल्लाबोल ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी केला आहे.

विधिमंडळ अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर वित्त, उद्योग, ऊर्जा, कामगार व खणीकरण, ग्रामविकास, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि नियोजन विभागांवर विस्तृत चर्चा केली. या चर्चेत बोलताना नाना पटोले म्हणाले की, आज राज्यात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सरकारने दावोस मधून लाखो कोटींची इन्व्हेस्टमेंट राज्यात आणली पण हे उद्योग गेले कुठे? यातून नेमके किती रोजगार निर्माण झाले याची श्वेतपत्रिका आपण जाहीर करणार का? याबद्दलची भूमिका सरकारने स्पष्ट करावी.

शेतकरी नवीन पिके काढून आपल्या उत्पन्नामध्ये वाढ करत आहे पण सरकार त्यांना मुबलक वीज देत नाही. लोड वाढल्यामुळे ट्रान्सफॉर्मर जळतात आणि शेतकऱ्यांचे पंप बिघडतात. एक पंप दुरुस्त करायला सहा ते सात हजार रुपये लागतात आणि दुरुस्त होण्यासाठी देखील किमान ४-५ दिवस लागतात. आर्थिक अहवालानुसार राज्याचा जीडीपी शेतीमुळे वाढला पण उन पावसाची तमा न बाळगता काबाडकष्ट करून शेतकऱ्यांनी राज्याचा जीडीपी वाढवला त्याच शेतकऱ्यांची परीक्षा हे सरकार अजून किती दिवस घेणार आहे. असा सवाल पटोले यांनी केला.

निवडणुकीत १२ तास वीज देण्याचे आश्वासन दिले पण आठ तासही शेतकऱ्यांना वीज मिळत नाही. ऊर्जा विभागाचे अधिकारी सांगतात सौर ऊर्जा लावा पण पाच सहा महिने अर्ज करून, पैसे भरून सुद्धा कंत्राटदार सौर ऊर्जेचे पंप लावून देत नाहीत आणि आणि कर्मचारी, अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात. मग शेतकऱ्यांनी कुणाकडे दाद मागायची? यावेळीच्या हवामानानुसार यंदा कडक उन्हाळा असणार आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. आणि मग शेतीचं काय होणार हा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला आहे, ऊर्जा विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेती पंपासाठी सरकार काय योजना देणार आणि शेतकऱ्यांचं पीक वाचवण्यासाठी सरकार काय उपाययोजना करणार याकडे तमाम शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. देशात सगळ्यात महाग वीज महाराष्ट्रात आहे. हे विजेचे दर कसे कमी होणार, या विभागात लागणाऱ्या खर्चात जो भ्रष्टाचार होत आहे तो कसा कमी करणार या सर्व प्रश्नांची उत्तरे सरकारला द्यावी लागतील. असंही पटोले म्हणाले.

राज्यातील करात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. वाढलेल्या करामुळे अनेक उद्योगपती महाराष्ट्र सोडून दुसरीकडे चालले आहेत. त्यामुळे चांगली व्यवस्था निर्माण करण्यासाठी तसेच उद्योगवाढीस चालना देण्यासाठी राज्य सरकार काय उपाययोजना करणार याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे. कामगार विभागाचे काम नेमके कामगारांसाठी चालते कि ठेकेदारांसाठी हा प्रश्न निर्माण झाला आहे. कामगारांसाठी पेट्या वाटल्या जातात पण त्या कुठे वाटल्या जातात, कोणत्या कामगारांना वाटल्या जातात, आज एक मोठा भ्रष्टाचार या कामगारांच्या नावाने प्रशासनातील काही लोक करत आहेत. प्रशासनातील लोक कामगारांच्या टाळूवरील लोणी खाण्याचे पाप करत आहेत. त्याबद्दल कामगार खात्याच्या मागण्यांमध्ये उत्तर आले पाहिजे. राज्यात खणीकरणाच्या माध्यमातून विशेषतः गडचिरोली जिल्ह्यात पर्यावरणाचा ऱ्हास करून आदिवासी जनतेचे जीवनमान उध्वस्त केले जात आहे. पाणंद रस्त्यांचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन सरकारने जाहीरनाम्यातून दिले होते, त्यावर अजून काहीच हालचाल झालेली नाही. पाणंद रस्ते किती दिवसांत पूर्ण करणार हे सरकाने सांगितले पाहिजे, असेही नाना पटोले म्हणाले.

Web Title: Congress leader nana patole has asked a question to the mahayuti government nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2025 | 07:18 PM

Topics:  

  • BJP
  • cmomaharashtra
  • Congress
  • devendra fadanvis
  • maharashtra
  • Nana patole

संबंधित बातम्या

RSS Chief Mohan Bhagwat: प्रत्येक भारतीयाने ३ अपत्ये जन्माला घालावीत! मोहन भागवत यांचे विधान चर्चेत
1

RSS Chief Mohan Bhagwat: प्रत्येक भारतीयाने ३ अपत्ये जन्माला घालावीत! मोहन भागवत यांचे विधान चर्चेत

Who is Next PM: कोण असणार पंतप्रधान मोदींचा उत्तराधिकारी? ‘या’ नावांना मिळाली सर्वाधिक पसंती; व्हाल थक्क
2

Who is Next PM: कोण असणार पंतप्रधान मोदींचा उत्तराधिकारी? ‘या’ नावांना मिळाली सर्वाधिक पसंती; व्हाल थक्क

‘भाजप आणि संघात मतभेद असू शकतात, पण मनभेद कधीच नाही’; सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान
3

‘भाजप आणि संघात मतभेद असू शकतात, पण मनभेद कधीच नाही’; सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान

Sangli : प्रत्येक कार्यकर्ता काँग्रेसला सक्षम करेल, ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा विश्वास
4

Sangli : प्रत्येक कार्यकर्ता काँग्रेसला सक्षम करेल, ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा विश्वास

ताज्या बातम्या

पुढे वाचा
जैशच्या दहशतवाद्यांनतर पाकिस्तान सुदानच्या लष्कराला पुरवणार शस्त्रे? भारताच्या हिंद महासागरातील सुरक्षेला आव्हान?

जैशच्या दहशतवाद्यांनतर पाकिस्तान सुदानच्या लष्कराला पुरवणार शस्त्रे? भारताच्या हिंद महासागरातील सुरक्षेला आव्हान?

NARI-2025 Report: महिलांसाठी देशातील सर्वात सुरक्षित शहर कोणते? NARI च्या अहवालातून धक्कादायक खुलासे

NARI-2025 Report: महिलांसाठी देशातील सर्वात सुरक्षित शहर कोणते? NARI च्या अहवालातून धक्कादायक खुलासे

गणेशोत्सवाच्या रंगात रंगली सोनाली कुलकर्णी; मराठमोळी साडीतील ‘हे’ फोटो पाहून तुम्हीही व्हाल फिदा!

गणेशोत्सवाच्या रंगात रंगली सोनाली कुलकर्णी; मराठमोळी साडीतील ‘हे’ फोटो पाहून तुम्हीही व्हाल फिदा!

Amol khatal Attack: शिवसेना आमदार अमोल खताळांवर जीवघेणा हल्ला, एक तरुण आला अन्…

Amol khatal Attack: शिवसेना आमदार अमोल खताळांवर जीवघेणा हल्ला, एक तरुण आला अन्…

Pune News : विद्यापीठाजवळील उड्डाणपुलाच्या कामात अनेक त्रुटी; वाहनचालकांची तीव्र नाराजी

Pune News : विद्यापीठाजवळील उड्डाणपुलाच्या कामात अनेक त्रुटी; वाहनचालकांची तीव्र नाराजी

कार खरेदीदारांना बाप्पा पावला! यंदाच्या Ganesh Chaturthi 2025 मध्ये Tata आणि Hyundai देतेय 6 लाखांपर्यंतचे डिस्काउंट

कार खरेदीदारांना बाप्पा पावला! यंदाच्या Ganesh Chaturthi 2025 मध्ये Tata आणि Hyundai देतेय 6 लाखांपर्यंतचे डिस्काउंट

‘डॅडी’ आता तुरुंगाबाहेर! शिवसेना नेत्याच्या हत्या प्रकरणात अरुण गवळीला जामीन मंजूर; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

‘डॅडी’ आता तुरुंगाबाहेर! शिवसेना नेत्याच्या हत्या प्रकरणात अरुण गवळीला जामीन मंजूर; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

व्हिडिओ

पुढे बघा
Amaravati : न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा, नवनीत राणा यांचा जरांगेंना सल्ला

Amaravati : न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा, नवनीत राणा यांचा जरांगेंना सल्ला

Sambhajinagar : मराठा समाजाने निवडणूक लढवली नाही म्हणून… काय म्हणाले जरांगे पाटील ?

Sambhajinagar : मराठा समाजाने निवडणूक लढवली नाही म्हणून… काय म्हणाले जरांगे पाटील ?

Amravati : वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी पर्यायी मार्गाची चाचपणी

Amravati : वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी पर्यायी मार्गाची चाचपणी

Kolhapur News : आता नाही माघार, शाहिरांचा जरांगेंना पाठिंबा

Kolhapur News : आता नाही माघार, शाहिरांचा जरांगेंना पाठिंबा

Latur: जिल्हाभरात गणरायाचे आगमन, पोलिसांचा कडक बंदोबस्त

Latur: जिल्हाभरात गणरायाचे आगमन, पोलिसांचा कडक बंदोबस्त

Manoj Jarange Patil News: Mumbai च्या आझाद मैदानात नाशिककर सहभागी होणार! आंदोलक काय बोलले?

Manoj Jarange Patil News: Mumbai च्या आझाद मैदानात नाशिककर सहभागी होणार! आंदोलक काय बोलले?

शाळकरी चिमुकल्याने बनवला महाराष्ट्रातील जागतिक वारसा किल्ल्यांचा देखावा, ठाण्यात कौतुकाची लाट

शाळकरी चिमुकल्याने बनवला महाराष्ट्रातील जागतिक वारसा किल्ल्यांचा देखावा, ठाण्यात कौतुकाची लाट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.