धाराशिव तालुक्यात टपाली मतदान ३०.८१ टक्के; ७१४ पैकी २२० मतदारांचा सहभाग (फोटो सौजन्य-Gemini)
धाराशिव : १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे उर्वरित टप्पे पुन्हा वेळापत्रकबद्ध करण्यात आले आहेत. आता ५ फेब्रुवारी २०२६ ऐवजी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होईल आणि मतमोजणी ७ फेब्रुवारी २०२६ ऐवजी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे. त्यानुसार, नामांकन दाखल करणे, अर्ज मागे घेणे, निवडणूक चिन्हांचे वाटप करणे आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध करणे हे टप्पे पूर्ण झाले आहेत. याचदरम्यान ३० जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान धाराशिव तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी टपाली मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १२ गटांमध्ये तसेच पंचायत समितीच्या २४ गणांमध्ये एकूण २२० टपाली मते नोंदली गेली असून त्याची टक्केवारी ३०.८१ इतकी आहे. टपाली मतदान कक्षाचे नोडल अधिकारी महादेव असलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यात एकूण ७१४ टपाली मतदार असून त्यापैकी २२० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
ढोकी गटात २४ पैकी ४ (१६%), पळसप ३८ पैकी १० (२६.३२%), कोंड ५८ पैकी २२ (३७.९३%), तेर ४८ पैकी १३ (२७.०८%), येडशी ९८ पैकी ३१ (३१.६३%), आंबेजवळगा ५८ पैकी २४ (४१.३८%), उपळा ८७ पैकी ३४ (३९.०८%), सांजा ६४ पैकी ६ (९.३८%), पाडोळी ४९ पैकी ३ (६.१२%), केशेगाव ३३ पैकी १० (३०.३०%), बेंबळी ८५ पैकी ३२ (३७.६५%) आणि वडगाव ७१ पैकी ३१ (४३.६६%) इतके मतदान झाले आहे.
ढोकी ९ पैकी ०, गोवर्धनवाडी १६ पैकी ४, पळसप १९ पैकी ३, जागजी १९ पैकी ७, कोंड २३ पैकी ६, इर्ला ३५ पैकी १६, तेर २२ पैकी ३, आळणी २६ पैकी १०, येडशी ६१ पैकी २३, तडवळे ३७ पैकी ८, आंबेजवळगा २८ पैकी ८, शिंगोली ३० पैकी १६, उपळा ४३ पैकी १३, वाघोली ४४ पैकी २१, सांजा ४३ पैकी ६, चिखली २१ पैकी ०, पाडोळी २२ पैकी ३, समुद्रवाणी २७ पैकी ०, केशेगाव २३ पैकी ५, करजखेडा १० पैकी ५, बेंबळी ३९ पैकी २६, रुईभर ४६ पैकी ६, वडगाव ४५ पैकी १७ आणि चिलवडी २६ पैकी १७ अशी मतदानाची आकडेवारी आहे. काही गट व गणांमध्ये मतदानाची टक्केवारी अत्यल्प असल्याचे दिसून येत असून, आगामी प्रत्यक्ष मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मतदान आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत होईल. त्यामुळे ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १०:०० वाजता निवडणूक प्रचार संपेल. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता संबंधित ठिकाणी मतमोजणी सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणांसाठी आदर्श आचारसंहिता संपेल. निवडून आलेल्या सदस्यांची नावे ११ फेब्रुवारी २०२६ पर्यंत सरकारी राजपत्रात प्रकाशित केली जातील.






