शिवसेनेचा करिष्मा! डॉ. नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू बिनविरोध; विधानभवन येथे अधिकृत घोषणा
शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३० एप्रिल २०२६ रोजी डॉ. नीलम गोऱ्हे आणि ओमप्रकाश (बच्चू) कडू यांना उमेदवारी दिली होती. २ मे रोजी झालेल्या छाननी प्रक्रियेनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी (नऊ अधिक एक पोटनिवडणूक) २३ एप्रिल ते १३ मे असा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० एप्रिल होती. त्यानंतर छाननीदरम्यान उर्वरित अर्जांमध्ये तांत्रिक त्रुटी आढळल्याने ते बाद झाले. परिणामी नऊ उमेदवार आणि नऊ जागा अशी स्थिती निर्माण होऊन ही निवडणूक बिनविरोध पार पडली.
या आनंदाच्या क्षणी बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “विधानपरिषदेच्या या निवडणुकीत आम्हा नऊ उमेदवारांना विजयी करण्याचे संकेत आधीच मिळाले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला आणि ओमप्रकाश (बच्चू) कडू यांना उमेदवारी दिली. अर्जांमधील तांत्रिक त्रुटींमुळे इतर अर्ज बाद झाल्याने आम्ही सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आलो. आज आम्हाला निवडणूक आयोगाचे प्रमाणपत्र विधानमंडळाच्या निर्वाचन अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले.”
त्या पुढे म्हणाल्या, “हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा वारसा पुढे नेत असलेले आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला ही संधी दिली. त्यांच्या या विश्वासाबद्दल मी मनापासून आभारी आहे आणि त्या विश्वासाला न्याय देण्यासाठी कार्यरत राहीन.”
Pune Nasrapur Bhor Case: “आरोपींना यापुढे पॅरोल…”, लैंगिक अत्याचार प्रकरणासंदर्भात फडणवीस
“महायुतीतील घटक पक्षांचे सहकार्य, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे मार्गदर्शन यामुळे मला लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या काळात अनेकांना मदत करता आली आणि पुढील काळातही महिला विकास, तीर्थक्षेत्र विकास, महिलांची सुरक्षा, पीडित महिलांचे संरक्षण, तसेच शिवसैनिकांच्या माध्यमातून विकासकामे लोकांपर्यंत पोहोचवणे आणि विधिमंडळातील कामकाज प्रभावीपणे पार पाडणे यासाठी मी सक्रिय राहणार आहे,” असेही त्यांनी नमूद केले.






