गोदामांच्या निर्मितीमुळे भिवंडी जलमय होण्याची भीती! तालुका महसूल प्रशासनाने सतर्क राहण्याची आवश्यकता; नागरिकांची अपेक्षा
मुंबई महानगरीच्या सीमेवर ठाणे जिल्हा वसला असून यापूर्वी ठाणे जिल्ह्याला भात पिकाचे कोठार म्हणून गौरवाने संबोधले जायचे. याच जिल्ह्यातील भिवंडी तालुका भात पिकाचे आगार म्हणून ठाणे जिल्ह्यात सुप्रसिद्ध होता. परंतु, आता भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागाचे रूपडे देखील बदलले असून गोदामांचा तालुका अशी भिवंडीची ओळख बनली आहे. वाढती गोदामे भिवंडी जलमय करतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागात खाडीतून अथवा नदीतून डुबी मारून पडावा द्वारे येथे काढणे, वीटभट्टी द्वारे विटा तयार करणे, मासेमारी व मच्छीविक्री करणे, लाकडे गोळा करणे, भाजीपाल्याची लागवड व विक्री करणे, दगड माती उत्खनन करणे, तसेच भात शेती करणे हे व्यवसाय नियमितपणे केले जात होते.(फोटो सौजन्य – AI)
आजमितीस देखील काही प्रमाणात हे व्यवसाय भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागातून केले जात आहेत. परंतु, काळाच्या ओघात व निसर्गाच्या असमतोलतऽमुळे व मानवी चुकांच्या कारणामुळे तसेच शासकीय अवकृपेमुळे या व्यवसायावर गंडांतर आले असून हे व्यवसाय विशेषतः भिवंडी तालुक्यातील भाजीपाला उत्पादन व भात शेती धोक्यात आली आहे.
पूर्वजांनी जीवाच्या मोलानी जपलेल्या शेत जमिनी नष्ट होण्याच्या मार्गावर असून या शेत जमिनीचा विकास करण्याच्या नावावर भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागातील म्हणजेच कशेळी, काल्हेर, कोपर, पूर्णा आणि इतर गावातून प्रचंड प्रमाणात टोलजंग गोदामे उभारली गेली आहेत. तर काही ठिकाणी गोदामे उभारण्याची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.
या मोठ्या प्रमाणात गोदामांची निर्मिती माळरान किंवा पडीक जमिनीवर न करता संबंधित शेतकऱ्यांच्या सुपीक शेत जमिनीवर सर्रासपणे करण्यात आली आहे. या गोदामांची निर्मिती करताना शेतजमिनीमध्ये प्रचंड प्रमाणात माती दगडांचा भराव करण्यात आल्यामुळे या शेतजमिनीवर व शेतजमिनीच्या परिसरात असणारे नैसर्गिक नाले, ओहळ, ओढे, खाच, खळगे आणि छोटे मोठे नैसर्गिक तलाव बुजवण्यात आले आहेत.त्यामुळे नैसर्गिकरित्या पडणारे पावसाचे पाणी वाहून जाण्यास व त्याचा निचरा होण्यास अडथळे निर्माण होत असून आगामी मान्सूनचा कालावधी लक्षात घेता अतिवृष्टी झाल्यास गोदाम पहुंचातील पावसाळी पाण्याचा निचरा जलद गतीने न होता पूरस्थिती निर्माण होऊन जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मीरा-भाईंदरमध्ये तीव्र पाणीटंचाई! सलग चौथा शनिवार कोरडा; नागरिक त्रस्त, नेत्यांवर निष्क्रियतेचे आरोप
पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था संबंधित गोदाम मालक किंवा स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन यांनी केल्याचे दिसून येत नाही. अशी उपाययोजना करणेचे कोणतेही नियोजन ठाणे जिल्हा महसूल प्रशासनने किंवा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांनी केल्याचे देखील दिसून येत नाही. या सर्व गोदामांची अति विराट बांधकामे करताना प्रचंड प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली असून शेतजमिनीच्या बांधावर व माळरानावर दिमाखात उभी असलेली निसर्गसंपन्न वृक्षसंपदा नष्ट झाल्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे.






