तिकीट काढत नसलेल्या प्रवाशांमुळे भारतीय रेल्वेला मोठे अर्थिक नुकसान होत आहे (फोटो - AI)
विनातिकीट प्रवासाला आळा घालणे, रेल्वे प्रवासात शिस्त राखणे तसेच वैध तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हक्क व सुविधा सुरक्षित ठेवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. तपासणीदरम्यान १६ हजार ७५८ विनातिकीट प्रवासी, ४३५४ अनियमित किंवा उच्च श्रेणीत अनधिकृत प्रवास करणारे प्रवासी, तसेच १९३९ बुकिंग न केलेल्या सामानाची प्रकरणे आढळली. ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी ३४ स्क्वॉड कर्मचारी, १६७ अॅमेनिटीज कर्मचारी आणि १८ स्टेशनरी कर्मचारी सहभागी झाले होते.
हे देखील वाचा : अवैध रेती उत्खननावर छापे! DIGच्या पथकाची कारवाई, १ कोटी ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
महत्त्वांच्या स्थानकांवर तपासणी
तसेच रेल्वे संरक्षण दलाच्या कर्मचा-यांनीही सहकार्य केले. फेब्रुवारी महिन्यात विभागातील महत्वाच्या स्थानकांवर व गाडधांमध्ये १३ फोर्टस तपासण्या आणि २ मोठ्या तपासण्या घेण्यात आल्या. यामुळे विनातिकीट प्रवासाविरुद्ध कारवाई अधिक कडक करण्यात आली.
दरम्यान, २७ फेब्रुवारी २०२६ रोजी एका दिवसातील सर्वाधिक कारवाई नोंदवण्यात आली, त्या दिवशी १२१२ प्रकरणे आढळून ८ लाख २९ हजार ३२९ रुपयांची वसुली करण्यात आली. फेब्रुवारी २०२६ मध्ये नांदेड विभागातून २.८४४दशलक्ष प्रवाशांनी प्रकस केला असून त्यातून ४६.३२ कोटी रुपयांचा महसूल मिळाला.
मागील वर्षीच्या तुलनेत प्रवासी महसुलात १९.२० टक्के तर प्रवासी संख्येत ३.८७ टक्के वाढ झाली आहे. नादेड विभागाने सर्व प्रवाशांना वैच तिकीट घेऊनच प्रवास करण्याचे व रेल्वे नियमाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच सुरक्षित, शिस्तबद्ध आणि प्रवासी केंद्रित रेल्वे सेवा देण्याचा विभागाचा प्रयत्न असल्याचे प्रशासनाने सांगितले.
हे देखील वाचा : वर्धापनदिनी मनसे पक्ष रायगडावरुन फुंकणार रणशिंग; राज ठाकरेंची सोशल मीडिया पोस्टमधून खास रणनीती
दुरुस्तीसाठी आलेल्या गाड्यांना लागली आग
बाफना टी पॉईंट येथील अरमान डेटिंग पेंटिंग या गैरजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या वाहनांना आग लागली होती आगीत तीन वाहने जळून खाक झाली असून चार वाहनांना सुरक्षित बाहेर काढण्यात अग्निशमनदलास यश मिळाले आहे. ही घटना शनिवार दि. ७ रोजी पहाटेच्या सुमारास घडली. पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस वाहनाने अग्निशमन विभागाला आग लागल्याची माहिती दिली माहिती मिळताच अग्निशमन दलाचे फायर टेंडर कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी रवाना झाले. या आगीत तीन वाहनांनी पेट घेतला होता. अग्निशमन विभागाने तात्काळ कार्यवाही करत आग आटोक्यात आणली व इतर चार वाहनांना आगीपासून वाचवले. आगीत स्कोडा, मारुती स्विफ्ट व महिंद्रा एक्सयूव्ही ही तीन वाहने जळाली असून महिंद्रा पिकअप, होंडा सिटी, टाटा इंडिका व महिंद्रा ही चार वाहने आगीपासून वाचवण्यात आली. याबाबतची माहिती अरमान डेटिंग पेंटिंगचे मालक तोफिक पठाण यांनी अग्निशमन विभागाला दिली. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नसल्याचे त्यांनी सांगितले. अग्निशमन अधिकारी के. एस. दासरे, उप अग्निशमन अधिकारी निलेश कांबळे, सावळे, लांडगे, नरवाडे, शिंदे तसेच वाहन चालक टारपे यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी परिश्रम घेतले.






