कर्जत तालुक्यातील पोशीर गावातील स्थानिक शेतकरी परशुराम गोपाळ हाबळे यांची शेती सध्या अडचणीत आली आहे. त्यांच्या शेतीकडे जाण्याचा रस्ता दगडी बांधकाम सुरू करून अडवण्यात आले आहे. मागील आठ ते दहा दिवसात तेथे बांधकाम करून शेतकऱ्याचा रस्ता बंद करण्यात आला आहे.पूर्वीपासून शेतीसाठी लागणारी अवजारे नेण्यासाठी वापरला जाणारा रस्ता अडवण्यात आला आहे. शेतकऱ्याला शेती करण्यासाठी हा रस्ता खुला करण्यात यावा यासाठी 16 मार्च रोजी कर्जत तहसीलदार डॉ धनंजय जाधव यांना पत्र देण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या किसान क्रांती संघटना यांच्याकडून शेतकरी तुकाराम हाबळे यांच्या उपस्थितीत न्याय मिळवून देण्याची मागणी तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली होती. हाबळे यांच्या मालकीच्या शेतीमध्ये कुंपण घालण्यासाठी खोदकाम करण्यात येऊ लागले,कोणीतरी खोदकाम करीत आहे हे समजल्यावर हाबले हे आपल्या शेतीकडे गेले असताना तेथे असलेल्या व्यक्तींनी तुकाराम हाबळे यांना धमकावले आणि पुन्हा इकडे यायचे नाही असे सुनावले आणि पाय तोडू अशी धमकी दिली. याबाबत शेतकरी पोलीस ठाण्यात पोहचले असता कोणीही दखल घेत नव्हता.
त्यानंतर शेतकऱ्यांनी माध्यमांना ही बाब सांगितल्यावर संबंधित ठिकाणी पोहचल्यावर सदर जमीन ही राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मुलाच्या नावे असल्याचे समजले. याच मंत्री महोदयांची मानकिवली येथे देखील जमीन असून मंत्र्याच्या सुपुत्र असल्याने पोलिस आणि महसूल प्रशासन शेतकऱ्यांच्या अन्यायाला न्याय देऊ शकत नाहीत.अधिकारी हतबल असल्याने शेतकऱ्याच्या पाठीशी किसान क्रांती संघटना उतरली असून मंत्र्यांचा मुलगा असला तरी आम्ही शेतकऱ्याला न्याय मिळवून देणार असा निर्धार किसान क्रांती संघटनेने केला आहे. शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन किसान क्रांती संघटनेने पाहणी केली असता शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात जमीन देखील मंत्र्यांच्या सुपुत्रच्या चेल्यांनी बळकावली असल्याचे दिसून आले आहे. त्याचवेळी तेथे काम पाहणारे मंत्र्याचे सुपुत्राचे चेले हे आमचे कोणीही काहीही करू शकत नाही,आमच्या पाठीशी कोण आहे हे तुम्हाला माहिती नाही,पत्रकार पण काही करू शकत नाहीत अशा बढाया मारल्या आहेत.
जमिनीवर केले जात असलेल्या अतिक्रमण प्रकरणी कळंब येथील आऊट पोस्टमध्ये शेतकरी रोशन तुकाराम हाबळे पोहचले असता त्यांना देखील पोलिसांना थारा दिला नाही. त्यानंतर कळंब येथे शासनाचे छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान सुरू असताना संबंधित शेतकरी तेथे पोहचले. त्यावेळी तहसीलदार जाधव यांनी मंडळ अधिकारी संतोष जांभळे यांना तत्काळ पंचनामा करावा आणि अहवाल सादर करावा असे सूचित केले.मात्र आठ दिवसात मंडळ अधिकारी देखील त्या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी पोहचले नाहीत.
रोशन तुकाराम हाबळे,शेतकरी
आमच्या शेतीकडे आल्यावर आम्हाला दमदाटी व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात.त्यामुळे राब भरण्याची वेळ आलेला आहे.सध्याच्या दिवसात भात शेती करण्यासाठी राब जाळला जातो,मात्र इथे आल्यावर आमच्या वडिलांवर दमदाटी करतात किंवा जीवे मारण्याचे धमक्या देतात.त्यामुळे आमचे वडील शेत जमिनीकडे येत नाही. साजिद हसन मुश्रीफ यांचे नावे आजूबाजूची जमीन असून शेतकऱ्यांना शेती मध्ये जाण्याची बंदी घातली गेल्याने आमची जमीन हडपण्याचा त्यांचा डाव दिसतोय.
जिजाबाई वामन राणे,शेतकरी पोशीर
जंगल जमीन विकली असता शेतजमीन ही लाटण्याचा प्रयत्न मंत्री हसीन मुश्रीफ यांचा आहे.आम्ही सातबारा उतारा यावरील लागवडीखाली नसलेली जमीन विकण्यात आली होती.मात्र त्यांनी सर्व जमीन हडपलेली असून माझी जमीन मी 35 वर्षे जुनी असून तेथे माझ्या जमिनीत झोपडी असून ही जागा पण माझी आहे मी विकली नाही. त्यामुळे मी इथून झोपडी काढणार नाही. माझी झोपडी ही मोडण्याचा प्रयत्न केला.मंत्री हसीन मुश्रीफ यांनी या अन्यायाला जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे. शेतकऱ्यांचा रस्ता ही अडवणूक केली जात आहे. रस्ता आढळल्यानंतर शेतकरी शेती करणार प्रसाद असाही सवाल या महिलेकडून केला जात आहे. आमच्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्त्याचा वापर करत होते असेही या महिलेकडून सांगण्यात आले.






