खासदार डॉ. अजित गोपछडे आणि खासदार अशोक चव्हाण यांचा नांदेडच्या विकासकामांसाठी दिल्लीमध्ये पाठपुरवठा केला (फोटो - सोशल मीडिया)
संसदेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने खासदारद्वय हे मागील आठवड्यात राजधानी दिल्लीत होते, रोज मंत्र्यांच्या भेटीचे नियोजन करत त्यांनी आपल्या मागण्या कशा रास्त आहेत, हे त्यांना पटवून दिले, मंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर या दोघांनी ती माहिती व्यवस्थित माध्यमांकडे पोहोचवत ‘हम भी है सक्रिय’ चा संदेश सर्वत्र पोहोचविला. त्यांच्या दिल्लीतील भेटीगाठीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली, या भेटींच्या माध्यमातून नांदेडच्या पदरात विकासाचे ‘दान’ पडले. विकासकामांची खासदारद्वयांची सुपरफास्ट एक्स्प्रेस दिल्लीत धावली. आठवडाभरात विविध प्रश्नांवर राज्यसभेत नांदेडचा आवाज घुमला.
हे देखील वाचा : उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक आरोग्य सुविधा; नेत्र शस्त्रक्रिया, सोनोग्राफी व डिलिव्हरी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध
‘नमामी गोदावरी’ साठी घेतला पुढाकार
डॉ. गोपछडे यांनी आपली वेगळी ओळख राजधानी दिल्लीत निर्माण केली असून प्रत्येक दिल्ली दौऱ्यात काही तरी नवीन मागण्या ते मंत्र्यांच्या दरबारात मांडतात, व त्याबाबतचे ठोस आश्वासन घेवूनच ते नांदेडला परततात अधिवेशनादरम्यान राज्यसभेत जास्तीत जास्त प्रश्न मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. नॉनस्टिक प्लॉस्टिकचा किचनमध्ये छुपा
धोका, नांदेड, बिलोली येथे डाक विभागासाठी उभारावी, गोदावरी शुद्धीकरण ‘नमामी गोदावरी ‘सीजीएचएस वेलनेस सेंटरला मंजुरी, सीसीआरएएस अनुसंधान केंद्राची मागणी, नांदेडमध्ये दुग्ध व्यवसायाला गती द्यावी, यौन उत्तेजक औषधीची बेकायदेशीर विक्री रोखा आदी विषयांवर मुद्देसूद मांडणी त्यांनी केली.
हे देखील वाचा : त्या ७५ शाळांना अल्पसंख्याक दर्जा कुणी दिला? दुखवट्याच्या काळात घेतलेल्या निर्णयावर संशय बळावला
तीन विधेयके निर्णायक
अद्ययावत इमारत, सुरक्षित आरोग्य, ग्राहक संरक्षण व वैद्यकीय क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता वापरासाठी राज्यसभेत डॉ. गापेछडे यांनी तीन महत्त्वपूर्ण विधेयके सादर केली. ही तीनही विधेयके निर्णायक ठरणार आहेत, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलबी उभारणी हा त्यांचा जिव्हाळाच्या प्रश्न असून त्याबाबत त्यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणीयर शिक्कामोर्तब केले, खा. गोपछडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले. स्थानिक विभागस्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावरील विषयांवर राज्यसभेत प्रश्न मांडून डॉ. गोपछडे यांनी आपल्यातील ‘चतुरस्व’ ते ची झलक दाखवून दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेवून सीमा सुरक्षा, राष्ट्रीय भाषा, व मराठवाडा विकासाबाबत निवेदन दिले. तसेच मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नांबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेवून निवेदन दिले. दिल्ली भेटीत प्रत्येकवेळी काही ना काही नांदेडकरांच्या हिताची बाब पदरात पाडून घेण्याचे काम खा. चव्हाण, डॉ. गोपछडे यांनी आजपर्यंत केले आहे, मागील आठवडा दिल्लीतील भेटीगाठीच्या वृतांताने चांगलाच चचैत आला. वेगवेगळ्या प्रश्नांची केलेली मुद्देसूद मांडणी, संबंधित मंत्र्यांकडून मिळालेली सकारात्मक उत्तरे, विकासकामांना त्यातून मिळालेली गती आदी बाबी दोन्ही खासदारांसाठी ‘फलदायी ठरल्या आहेत. दिल्लीत त्याचे वाढलेले ‘वजन’ राजकीयदृष्टया नांदेडकरांच्या फायद्याचे ठरत आहे.






