याचवेळी मेहता यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर पलटवार करत गंभीर आरोप केले. “आरटीओमध्ये भ्रष्टाचार करून प्रताप सरनाईक मीरा-भाईंदर शहरात फाईव्ह स्टार हॉटेल उभारत आहेत,” असा आरोप त्यांनी केला. या विधानामुळे राजकीय वातावरण अधिक तापले आहे.दरम्यान, प्रताप सरनाईक यांनीही मेहता यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले. “नरेंद्र मेहता हे स्वतः दर्जाहीन नेते आहेत आणि त्यांच्या वक्तव्यामुळे राजकारणाचा स्तर खालावत आहे. आम्ही कोणतेही बेकायदेशीर काम केलेले नाही, म्हणूनच त्यांना नोटीस पाठवली आहे,” असे सरनाईक यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले, “ठाण्यात त्यांना कोणीही भीक घातलेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर ते निवडून येतात. स्वतःच भ्रष्टाचारात गुंतलेले असताना इतरांवर आरोप करणे चुकीचे आहे.”या संपूर्ण प्रकरणामुळे भाईंदरपाडा जमीन वाद पुन्हा चर्चेत आला असून पुढील काळात हा वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपांदरम्यान प्रत्यक्षात सत्य काय, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.






