समर स्पेशलमध्ये पुणे विभागातून फक्त 54 फेऱ्या महाराष्ट्रासाठी (फोटो -सोशल मीडिया)
पुणे : उन्हाळी सुट्यांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. असे असले तरी यामध्ये महाराष्ट्रातील प्रवाशांकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र समोर आले आहे. पुणे विभागातून एकूण ५७७ समर स्पेशल फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून, त्यापैकी तब्बल ५२३ फेऱ्या परराज्यांसाठी आहेत. राज्यांतर्गत प्रवासासाठी मात्र केवळ ५४ फेऱ्या ठेवण्यात आल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली आणि पश्चिम बंगाल या राज्यांकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन पुणे-गोरखपूर, पुणे-दानापूर, पुणे-वाराणसी, पुणे-निजामुद्दीन अशा लांब पल्ल्याच्या मार्गांवर मोठ्या प्रमाणावर फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. हडपसर स्थानकावरून प्रयागराज आणि झाशीमार्गेही विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे परराज्यातील प्रवाशांना दिलासा मिळणार असला, तरी स्थानिक प्रवाशांच्या गरजांकडे दुर्लक्ष झाल्याची भावना आहे.
महाराष्ट्रासाठी असलेल्या ५४ फेऱ्यांमध्येही मुख्य भर पुणे-नागपूर मार्गावर आहे. मर्यादित फेऱ्यांमुळे कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील इतर भागांसाठी जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक गाड्यांमध्ये वेटिंग लिस्ट शंभरी पार गेल्याने नागरिकांना खासगी प्रवासाचा पर्याय स्वीकारावा लागत आहे. प्रवासी संघटनांनी कोकण, मराठवाडा आणि विदर्भासाठी अतिरिक्त विशेष गाड्या सुरू करण्याची मागणी केली असून, राज्यांतर्गत प्रवासालाही समान प्राधान्य देण्याची गरज व्यक्त केली आहे.
कोणताही भेदभाव केलेला नाही
प्रवाशांची संख्या पाहून उन्हाळी सुट्यांतील या गाड्या सोडण्यात आल्या आहेत. यामध्ये कोणताही भेदभाव केलेला नाही.
– हेमंत कुमार बेहरा, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे
भारतीय रेल्वेत आता लक्झरी ट्रेन्स
रेल्वेचा प्रवास म्हणजे गर्दी, गोंधळ, भांडणं, फेरीवाल्यांच्या हाका…याच गोष्टी आपल्या पहिल्या ध्यानात येतात. पण या लग्झरी ट्रेन्समध्ये तुम्हाला या कोणत्याही गोष्टीचा अनुभव येणार नाही. इथे प्रवेश करताच तुम्हाला ड्रींक सर्व्ह केली जाईल, तुमच्या स्वागतासाठी लाल गालिछा पसरवला जाईल आणि अशा अनेक गोष्टी घडतील ज्या ट्रेनमध्ये अनुभवण्याचा आपण विचारही करु शकत नाही.






