(फोटो सौजन्य: x )
Mangoes Export: भारतात फळांचा राजा मानला जाणारा आंबा सध्या जागतिक पातळीवर धुमशान घालत आहे. जागतिक बाजारपेठेत पुन्हा एकदा आपली छाप पाडत आहेत. वाढती निर्यात, उत्तम दर आणि परदेशस्थ भारतीय तसेच परदेशी ग्राहकांमध्ये वाढत असलेल्या लोकप्रियतेमुळे भारतीय आंब्याच्या निर्यातीने नवीन उंची गाठली आहे. आखाती देशांपासून ते युरोप, सिंगापूर आणि अमेरिकेपर्यंत, भारतीय आंब्यांचा क्रेझ चांगलाच वाढत आहे. सध्या त्यांच्या बाजारांमध्ये आंबे घेण्यासाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. पण नेमका हा इतका क्रेझ का?
Tata Motors आणि HPCL मध्ये ऐतिहासिक करार; ऑटोमोटिव्ह कचऱ्यापासून बनवणार उच्च दर्जाचे रिफाइंड ऑईल
भारत हा जगातील आंब्याचा सर्वात मोठा उत्पादक देश असून, जागतिक उत्पादनात त्याचा वाटा जवळपास निम्मा आहे. ‘बिझनेस टुडे’नुसार, देशाची प्रचंड लोकसंख्याच देशातील आंब्याच्या उत्पन्नानंतर बराचसा भाग फस्त करते. असं असले तरी, अलिकडच्या वर्षांत लॉजिस्टिक्स, इरॅडिएशन सुविधा आणि कोल्ड-चेन नेटवर्कमधील सुधारणांमुळे निर्यातीत देखील प्रचंड वाढली आहे.
एग्रीकल्चरल एंड प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेवलपमेंट अथॉरिटीच्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये भारताने सुमारे २९,९३८ मेट्रिक टन ताज्या आंब्यांची निर्यात केली, ज्यातून ₹४७० कोटींहून अधिक निर्यात महसूल प्राप्त झाला.
सिंगापूरमध्ये उत्साहाचे वातावरण
भारतातील सिंगापूरच्या उच्चायुक्तालयाने केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमध्ये या उत्साहाचे यथार्थ चित्रण समोर आलं आहे. त्या पोस्टमध्ये म्हटले आहे: “मंडळी, भारतीय आंब्यांच्या क्रेझने सिंगापूरला पूर्णपणे भुरळ घातली आहे! भारतातील विविध राज्यांतून आलेले आंबे सिंगापूरमधील सुपरमार्केट्समधून अक्षरशः हातोहात विकले जात आहेत.”
Guys, #indianmango fever has landed in Singapore. Mangoes from all states of India are flying off the shelves. Thanks to @protosphinx for sharing the story with us. HC Wong#mango #mangoexport @AgriGoI #fruit pic.twitter.com/vQWkjR5jN4 — Singapore in India (@SGinIndia) May 25, 2026
UAE: सर्वात मोठा खरेदीदार
आंब्यांसाठीची भारतीय मागणी आखाती देशांमध्ये सर्वाधिक आहे. संयुक्त अरब अमिराती हा आंब्यांचा सर्वात मोठा खरेदीदार देश आहे.
APEDA च्या माहितीनुसार, केवळ २०२४ या वर्षातच भारताने UAE ला २० दशलक्ष डॉलर्स किमतीचे, १२,००० मेट्रिक टनांहून अधिक आंबे निर्यात केले आहेत. आखाती देशांव्यतिरिक्त, अमेरिका, युके, कतार आणि कुवेत यांसारख्या देशांमध्येही आंब्यांची मागणी वेगाने वाढली आहे.
HE @AmbGVSrinivas inaugurated the 23rd edition of the Mango Mania festival at Lulu Hypermarket in Muscat yesterday. This year, the annual event showcased over 50 premium mango varieties from India, alongside selections from across the globe. In addition to fresh fruit, the… pic.twitter.com/it7ijRisan — India in Oman (Embassy of India, Muscat) (@Indemb_Muscat) May 25, 2026
गेल्या दशकात, भारताच्या आंबा निर्यात परिसंस्थेचे लक्षणीय आधुनिकीकरण झाले आहे. भारतीय निर्यातदार आता उत्कृष्ट पॅकेजिंग, प्रगत पिकवण्याची पायाभूत सुविधा आणि पाश्चात्य राष्ट्रांनी अनिवार्य केलेले कठोर वनस्पती आरोग्यविषयक नियम यांचे पूर्णपणे पालन करत आहेत.
परदेशातील भारतीय दूतावासांनी, APEDA च्या सहकार्याने, खाद्य महोत्सव आयोजित करून आणि प्रमुख रिटेल चेनसोबत करार करून परदेशी सुपरमार्केटमध्ये भारतीय आंब्यांच्या ब्रँडिंगला बळकटी दिली आहे. या मजबूत मागणीनंतरही, निर्यातदारांना आंब्याच्या हंगामाचा कमी कालावधी, हवाई मालवाहतुकीचा जास्त खर्च आणि काही देशांनी लादलेले कठोर आयात नियम यांसारख्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे.






