Raigad News: रोह्यात धोकादायक लोखंडी कॉईल वाहतूक सुरूच; नागरिकांच्या तक्रारीनंतरही कारवाई नाही
मुंबईत शिक्षकांच्या थकीत देयकांचा प्रश्न गंभीर; आमदार अभ्यंकरांनी मागितला तातडीचा अहवाल
या अवजड, धोकादायक, जीवघेण्या व वाहतूकीस अडथळा निर्माण करणाऱ्या समस्येची तक्रार रोहा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांच्याकडे रोहिदास नगरसह सर्वच रोहे अष्टमीकर नागरिकांनी करताच त्यांनी तातडीने या गंभीर समस्येकडे आपले लक्ष वेधले. आपल्या शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्यांनी व मुख्याधिकारी यांनी लेखी पत्र पोलीस उपविभागीय अधिकारी यांना देत यावर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र आजवर या अवजड वाहतुकीवर कोणतेही निर्बंध न येता ती दिवसेंदिवस वाढत आहे.
नगराध्यक्षा यांच्या अर्जाची अशी दखल रात्री अपरात्री होणारी ही वाहतूक सर्वच प्रकरच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरत आहे. मात्र असे असताना नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांच्या सामाजिक जाणीवेतून केलेल्या तक्रारी अर्जाचा फायदा वरसे ग्रामपंचायतला होत त्यांना ओपन जिम पास्को व सहयोगि कंपनीने आपल्या सामाजिक दायित्व निधीतून दिली असल्याचे दिसत आहे. आपल्या नागरिकांच्या सर्व प्रकारच्या सुरक्षेसाठी जागृत असणाऱ्या नगराध्यक्षा यांच्या अर्जाची अशी दखल पास्को कंपनीने कोणाच्या आदेशानुसार वा मागणीने घेतली? याचा खुलासा कंपनीने करावा, अशी मागणी रोहिदास नगर मधील स्थानिकांचे सह रोहेअष्टमीकर नागरिकांमधून होत आहे. पिंगळसई मधील धामणसई, सोनगाव, गावठाण, मालसई, मूठवली, गावठाण गावातील नागरिकांसह अष्टमीमधील नागरिकांना रुंद व सुरक्षित रस्ते या कंपन्यानी द्यावे त्यानंतरच ही अवजड व धोकादायक वाहतूक येथून करावी, अशी मागणी नागरिक करत आहे.
रोहा रेल्वे स्थानकालगत जेएसडब्लू कंपनीचे स्वतंत्र रेल्वे यार्ड आहे. याठिकाणी सुरुवातीला लोखंडासाठी लागणारा कच्चा माल भुकटी, गोटी उतरून त्याची वाहतूक डोलवी, साळाव येथे करण्यात येत होती. रस्ते वाहतूक व नागरिकांचे आरोग्य यासाठी धोकादायक असणाऱ्या या वाहतूकीस वेळोवेळी स्थानिकांनी विरोध करत यावर योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली होती, या वाहतूकीस समीर शेडगे यांनी लोकभावानेतून नेहमीच विरोध करत तत्कालीन प्रांत, पोलीस अधिकारी यांच्या समोर ही समस्या मांडली, त्यानंतर आरोग्यासाठी हानिकारक वाहतूक आजवर पूर्णतः बंद झाली. आता याच यार्डातून २४ टन वजनाच्या लोखंडी कॉईलची वाहतूक येथून मोठ्या प्रमाणात सुरु आहे.
एक ट्रेलर काही महिन्यापूर्वी येथील एका वळणावर पलटला होता. मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र रेल्वे स्टेशन ते अष्टमी पूल, बायपास रोड या दरम्यान या वाहतुकीमुळे अनेक अपघात होत जीवितहानी झाल्याच्या घटना घडू लागल्या. रोहा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे मार्च महिन्यात अर्ज करत पास्को व मातेश्वरी ट्रान्सपोर्ट यांची वाहतूक तात्काळ बंद करावी, अशी मागणी केली होती. मात्र यावर कोणतीही कारवाई न होता वरसे ग्रामपंचायतीसाठी कंपनी ओपन जिम उपलब्ध करून दिली. यामध्ये नक्की गौडबंगाल काय आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.






