पुणे वन विभागाचे पर्यटकांना आवाहन (फोटो- ai gemini)
सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळणे, दगड घसरणे, झाडांच्या फांद्या तुटणे तसेच धबधबे, ओढे आणि नाल्यांमधील पाण्याचा प्रवाह अचानक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पर्यटकांनी अधिक सतर्क राहूनच पर्यटनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. हवामानात क्षणाक्षणाला होणारे बदल लक्षात घेता काही मिनिटांतच पाण्याचा प्रवाह धोकादायक पातळीवर जाऊ शकतो, असेही वन विभागाने स्पष्ट केले आहे.
पुण्यावर घोंघावतंय भयंकर संकट; सावधान! Khadakwasla Dam मधून कोणत्याही क्षणी…, नागरिकांना आवाहन
कोणतीही आपत्कालीन परिस्थिती, अपघात, मार्ग चुकणे, वनाग्नी किंवा वन्यप्राणी संबंधित घटना घडल्यास १९२६ या टोल-फ्री हेल्पलाईनवर तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
पुणे वन विभागाच्या मार्गदर्शक सूचना –
* धबधबे, ओढे, नाले व वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरू नये.
* दरडप्रवण, घसरडे व कड्यालगतचे धोकादायक भाग टाळावेत.
* धबधब्यांच्या माथ्यावर किंवा प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करू नये.
* सेल्फी किंवा छायाचित्रणासाठी जीव धोक्यात घालू नये.
* अतिवृष्टी, दाट धुके किंवा विजांचा कडकडाट असल्यास पर्यटन टाळावे.
* वन विभागाचे इशारा फलक व कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे.
* मद्यपान करून पर्यटनस्थळी वावरू नये.
* लहान मुलांवर सतत लक्ष ठेवावे.
* वनक्षेत्रात कचरा टाकू नये व पर्यावरणास हानी पोहोचवू नये.
* वन्यजीवांना त्रास होईल असे वर्तन टाळावे.
* आपत्कालीन परिस्थितीत १९२६ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा.
Ashadhi Wari 2026: वारकऱ्यांनो आळंदीत येऊ नका! इंद्रायणीला महापूर, देवस्थानचे आवाहन
‘पावसाळा हा निसर्गाचा उत्सव आहे. पर्यटकांनी निसर्गाचा मनमुराद आनंद घ्यावा; मात्र स्वतःची सुरक्षितता, वनक्षेत्रातील नियम आणि पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी यांचे भान ठेवून जबाबदार पर्यटनाला प्राधान्य द्यावे.’
-अभिजित वायकोस, उपवनसंरक्षक, पुणे
खडकवासला धरण 32 टक्के भरले
पावसाचा जोर अशाच पद्धतीने राहिल्यास धरण 80 टक्के भरले जाऊ शकते. त्यामुळे तसे झाल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये असे आवाहन करण्यात आले आहे. पुणेकरांना खडकवासला धरण 32 टक्के भरल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.






