Raigad News: लोणेरेतील शेतात गटाराचे सांडपाणी; पिकांचे नुकसान, संतप्त शेतकऱ्यांचा उपोषणाचा इशारा
मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक अशा दूषित पाण्यामुळे पिकांची वाढ खुंटते पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होतो आणि उत्पादनात मोठी घट येते. अन्नधान्याच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होऊन त्याचा मानवी आरोग्यावर देखील परीणाम होत आहे. गटाराच्या पाण्यात मानवी विष्ठा आणि विविध हानिकारक जिवाणू असतात अशा गटाराच्या पाण्यावर अन्नधान्य खाल्ल्यास ते मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतात.
नुकसानग्रस्त शेतकरी नितेश तुकाराम टेंबे, जयदास टेंबे, शाम टेंबे, सदानंद टेंबे यांच्या शेतात गटाराचे सांडपाणी साचले आहे. यामुळे उन्हाळी कडधान्य पीक देखील घेता येत नसून पावसाळ्या मध्ये तर शेत म्हणजे अक्षरशः गटारे झाली आहेत त्यामुळं उन्हाळी आणि पावसाळी शेती करणे अवघड होऊन बसले आहे. याकडे मात्र शेतकरी वर्ग ग्रामपंचायत प्रशासना कडे मागणी करून सुध्दा कुठलीही उपाययोजना करून देण्यास ग्रामपंचायत प्रशासन पूर्ण पणे अपयशी ठरले आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाने यापुढे गभीरपणे विचार करण्याची गरज आहे. नवीन बांधकाम परवानगी घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना ग्रामपंचायत प्रशासनाने आणि ग्रामसेवक यांनी नवीन बांधकाम करणाऱ्यांनी नैसर्गिकरित्या पाणी जाण्यासाठी नाले, त्याचे स्वतःचे पाणी जाण्यासाठी उपाययोजना किंवा शोषखड्डे आहेत किंवा नाहीत. याची पाहणी छाननी केल्याशिवाय बांधकाम परवाने ग्रामपंचायत प्रशासनाने दिले नाहीत तर अशा समस्या यापुढे निर्माण होणार नाहीत. – शाम टेंबे, स्थानिक शेतकरी
लोणेरे शहरातील गटाराचे दूषित, सांडपाणी शेतात जात असल्याने भातशेतीचे शेतीचे व कडधान्ये पिकांचे अत्यंत मोठे नुकसान होत आहे तसेच प्लास्टिक पिशव्या बॉटल याने अक्षरशः शेताची दैना झालेली पहायला मिळत आहे तसेच गटारातून वाहत येणाऱ्या कचऱ्यापासून या पाण्यामुळे जमिनीची सुपीकता देखील नष्ट होते आणि पिकांवर गंभीर परिणाम होत आहेत. गटाराचे पाणी शेतात सोडल्याने जमिनीचे आरोग्य धोक्यात येऊन पिकांची प्रत आणि उत्पादन घटणे यासारखे नुकसान शेतकरी वर्गाला सहन करावे लागत आहेत.






