विविध ठिकाणांहून पाण्याचे नमुने गोळा करून त्यांची तपासणी केली जाते. फिजिओ-केमिकल घटक, धातू, कीटकनाशके तसेच पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण यासारख्या मापदंडांच्या आधारे नद्यांच्या पाण्याचा दर्जा निश्चित केला जातो. विशेषतः बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड (बीओडी) आणि केमिकल ऑक्सिजन डिमांड (सीओडी) या निकषांच्या आधारे नदीतील प्रदूषणाचा स्तर ठरवला जातो.
निकषांनुसार पाण्यातील बीओडीचे प्रमाण ३ मिलीग्रॅम प्रति लिटरपेक्षा कमी असल्यास पाणी स्वच्छ, 3 ते 10 मिलीग्रॅम दरम्यान असल्यास मध्यम प्रदूषित, तर 10 मिलीग्रॅमपेक्षा जास्त असल्यास अतिप्रदूषित मानले जाते. तसेच चे प्रमाण 10 ते 20 मिलीग्रॅम प्रति लिटर दरम्यान असल्यास पाणी स्वच्छ समजले जाते; त्यापेक्षा जास्त असल्यास ते प्रदूषित असल्याचे मानले जाते.२०२५ च्या अहवालानुसार देशभरातील 623 प्रमुख व मोठ्या नद्यांचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये 271 नद्यांमध्ये 216 प्रदूषित पट्टे आढळून आले असून त्या यादीत वाशिष्ठी नदीचाही समावेश आहे. मात्र याबाबत चिपळूण नगरपालिका यांना कोणत्याही प्रकाराचे पत्र आले नाही तसा अहवाल सुद्धा आला नसल्याचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी सांगितले ते नेमके काय म्हणाले ते जाणून घेऊयात.
औद्योगिक सांडपाण्याचा परिणाम
वाशिष्ठी नदीच्या प्रदूषणामागे लोटे-परशुराम औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांचे सांडपाणी हे प्रमुख कारण असल्याची चर्चा आहे. औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी शुद्ध करण्यासाठी लोटे येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यरत असला तरी काही कारखानदारांकडून नियमांचे उल्लंघन करून थेट नदीत सांडपाणी सोडले जात असल्याच्या तक्रारी आहेत. काही ठिकाणी टँकरद्वारे रात्रीच्या वेळी चोरीने सांडपाणी नदीत सोडले जात असल्याचेही सांगितले जाते त्यावर बंधन आले पाहिजे अशी मागणी चिपळूण जलदूत शहानवाज शहा यांनी केली आहे.
उमेश सकपाळ,नगराध्यक्ष चिपळूण
राज्यातील सर्वच नद्या प्रदूषित आहेत मात्र चिपळूण वाशिष्ठी नदी प्रदुषित असल्याचा तसा अहवाल चिपळूण नगरपालिका यांना अद्याप आला नाही मात्र चिपळूण मधील शिवनदीचे सांडपाणी हा विषय खूप गंभीर आहे त्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभा करण्यासाठी 70 ते 80 कोटी लागतील तेवढा निधी नगरपालिका कडे नाही पण तसा प्रस्ताव पाठवण्याचे काम लवकरच करण्यात येईल अशी माहिती मुख्याधिकारी संजय जाधव यांनी दिली.
या सर्व प्रकरणाचा आवाज काँग्रेसचे गटनेते नगरसेवक साजिद सरगुरोह यांनी उठविला आहे याबाबत त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात जाऊन अधिकारी यांना जाब विचारला याबाबत त्याने नवराष्ट्र चैनल ला काय प्रतिक्रिया दिली ते देखील जाणून घेऊयात.
जल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याची मागणी दरम्यान, या अहवालावर प्रतिक्रिया देताना आमदार भास्कर जाधव यांनी वाशिष्ठी नदी प्रदूषणाच्या यादीत येणे धक्कादायक असल्याचे सांगितले. चिपळूण नगरपालिकेला पाणी शुद्धीकरणासाठी उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आल्या असल्या तरी निधीअभावी काम होत नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र अशा प्रकारे हात झटकून चालणार नाही. वाशिष्ठी नदीवर त्वरित सांडपाणी शुद्धीकरण केंद्र उभारणे अत्यावश्यक असून अन्यथा भविष्यात नागरिकांना गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे नगरपालिकेने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार ,भास्कर जाधव
या सांडपाण्यातील घातक रसायने जलशुद्धीकरण प्रक्रियेत पूर्णपणे नष्ट होत नसल्याने भविष्यात मानवी आरोग्य तसेच नदीतील जलजीवांसाठी धोका – निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.मात्र चिपळूण नगरपालिका स्वच्छ पाणी चिपळूण वासियांना देत आहे त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये असे आवाहन नगरद्यक्ष उमेश सकपाळ यांनी केले आहे.






