सातारा शहरालगत असलेले शाहूपुरी परिसरातील शाहूपुरी या चौकात व्यवसायिकांनी केलेले अतिक्रमण नागरिकांसाठी घोकादायक ठरत आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती वाढलेली असल्याने वाहनांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या चौकातून ये जा करणाऱ्या नागरिकांबरोबरच वाहनांची संख्या अधिक असल्याने शाहूपुरी चौकात वाहतुकीची कोंडी नियमितपणे होत असल्याचे दिसून येत आहे, शहरातून आयटीआय मोळाचा ओढा कोंडवे याकडे जाण्यासाठी नागरिकांना व वाहन चालकांना या चौकातून जावे लागते तसेच आंबेदरे, दिव्यनगरी, माळवाडी या भागातील नागरिकांना शहरात येताना या चौकातून ये जा करावी लागते त्यामुळे या चौकातील अतिक्रमणे नगरपालिका प्रशासनाने दूर करून नागरिक व वाहनचालकांना दिलासा द्यावा.
– श्रीरंग काटेकर, सातारा
अनेक अतिक्रमणे भूईसपाट; रस्ता घेतोय मोकळा श्वास
अदालत वाडा ते समर्थ मंदिर चौक परिसरात असंख्य अनधिकृत अतिक्रमणे भूईसपाट झाल्याने आता येथील अरुंद रस्ते रुंद झाले आहेत. नागरिकांमधून या कृतीचे समाधान व्यक्त होत आहे. प्रशासनाने मनावर घेतले तर अशक्य ते शक्य करता येते हेच यावरून दिसून येते. साताऱ्यातील वाढते अतिक्रमणे हा चिंतेचा विषय ठरत असताना सातारा नगरपालिका प्रशासनाने घेतलेली कडक भूमिकेमुळे अतिक्रमण माफियांचे धाबे दणाणले आहेत. शहरातील विविध भागातील असणारे अतिक्रमणे याच पद्धतीने हटवली पाहिजेत अशी भूमिका साताऱ्यातील नागरिकांची आहे. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या अतिक्रमणे या विषयाला आता गती मिळाली असून समर्थ मंदिर चौकापासून यास प्रारंभ झाला आहे.
Gokul Dudh Sangha बाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल; सत्ताधारी गटाला मोठा दिलासा






