• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • When Will Eknath Shinde Come To Mumbai Deepak Kesarkar Said Nrdm

एकनाथ शिंदे मुंबईत कधी येणार?; दीपक केसरकर म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची साथ सोडून भाजपसोबत सरकार बनविण्यावर एकनाथ शिंदे ठाम आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. दरम्यान आमच्या गटाला विधानसभा उपाध्यक्षांनी मान्यता दिली तर दुसऱ्या क्षणाला आम्ही मुंबईत येऊ, असं सेनेचे बंडखोर नेते दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 26, 2022 | 01:26 PM
एकनाथ शिंदे मुंबईत कधी येणार?; दीपक केसरकर म्हणाले…
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : शिवसेनेच्या आमदारांनी बंड पुकारल्यामुळे सध्या महारष्ट्राचं अख्ख राजकारण हादरलंय. मंत्री एकनाथ शिंदे हे काही आमदारांना घेऊन निधून गेल्याने शिवसेनेतील धूसफूस चव्हाट्यावर आली. सध्या शिंदे यांचा गुवाहाटीमध्ये मुक्काम असून आपल्यासोबत शिवसेनेचे बहुसंख्य आमदार असल्याचा त्यांचा दावा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची साथ सोडून भाजपसोबत सरकार बनविण्यावर शिंदे ठाम आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. दरम्यान आमच्या गटाला विधानसभा उपाध्यक्षांनी मान्यता दिली तर दुसऱ्या क्षणाला आम्ही मुंबईत येऊ, असं सेनेचे बंडखोर नेते दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं आहे.

दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले ?

‘आमच्या गटाला विधानसभा उपाध्यक्षांनी मान्यता दिली तर दुसऱ्या क्षणाला आम्ही मुंबईत येऊ. आम्ही मनापासून प्रेम करणारे आहोत. जो लढा कोकणात उभा केला, तोच लढा मुंबई उभा करू शकतो. कोकणी माणसांनी शिवसेना उभी केली आहे, असा इशाराही केसरकरांनी दिला. ‘आम्ही आमचा गट तयार केला आहे. पुढचा निर्णय काय करायचा हे अजून ठरलं नाही. तुम्ही ज्या प्रकारे काम करत आहात, त्याच लोकांनी शिवसेना उभी केली, त्यांनी रक्त आटवलं आहे. एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून काढून टाकलं आहे. एकीकडे लोकांना बोलण्यासाठी पाठवलं आणि दुसरीकडे गटनेतेपदावरून काढून टाकलं. हे चुकीचे आहे. अगदी त्यांचं ऐकून घ्या, मग कारवाई करा. पण, असं झालं नाही, असंही दीपक केसरकर म्हणाले.

पुढे बोलताना केसरकर म्हणाले की, चौपाटी ही राज्याचा मुख्यमंत्री ठरवत नाही. मुख्यमंत्री हे नरिमन पॉईंटमधील विधीमंडळात ठरत असतो, जनता ठरवत असते. ते पवित्र असे व्यासपीठ आहे. त्यांनी एक आमदाराला जनावराची उपमा दिली. महिलांबद्दल आक्षेपार्ह बोलले. महिन्यापूर्वीच तुम्हाला आमदारांनी निवडून आणलं. कुठल्या तरी माणसाच्या मनात वेदना निर्माण होते. त्यामुळे वाद निर्माण होते, राज्यात दंगली निर्माण होतात. जर उद्या आमदारांच्या घरांवर हल्ले होत राहिले आणि राष्ट्रपती राजवट जर लागली तर तुम्ही काय करणार. तुम्ही ती परिस्थिती आणताय. मग भाजपवर आरोप करायचे नाही, असा इशाराच केसरकर यांनी दिला.

50 लोक सांगत असताना निर्णय घ्यावा लागेल

‘भाजप आणि सेनेनं एकत्र निवडणूक लढली. त्यावेळीही उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतला आणि बाहेर पडले. त्यावेळी भाजप काय रस्त्यावर उतरली का, पोस्टर जाळले का, त्यांनी असं काही न करता निर्णय स्विकारला. तुम्हालाही निर्णय स्विकारावा लागेल, असा सल्लावजा टोलाही केसरकर यांनी शिवसेनेला दिला. तसेच ‘या पेक्षा वाईट परिस्थिती कोकणामध्ये होती. त्यामध्ये मी लढा दिला होता. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असते. मुख्यमंत्र्यांनी त्यांना समजावून सांगितले पाहिजे. आमदारांना एकीकडे बोलवायचे आणि दुसरीकडे कारवाईचा इशारा द्यायचा, हे योग्य नाही. बाळासाहेबांचे शिवसैनिक हे लोकांची काम करायचे. 90 टक्के समाजकारण करत होते. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा वेगळा चेहरा समोर आणला. त्यांचा चेहरा हा कायम राहिला पाहिजे. पण, आम्ही दीड वर्षांपासून त्यांना सांगत आहे. जेव्हा 50 लोक सांगत असताना निर्णय घ्यावा लागेल, असंही केसरकर म्हणाले.

[read_also content=”राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या नवनीत राणांना मिटकरींचे सणसणीत उत्तर, म्हणाले… https://www.navarashtra.com/maharashtra/mitkaris-scathing-reply-to-navneet-rana-demanding-presidents-rule-said-nrdm-296982.html”]

केसरकरांना भाजपनी ऑफर

केसरकर यांनी भाजप प्रवेशाबाबत एक खुलासा केला आहे. ते म्हणाले की, ‘मी शिवसेनेवर प्रेम केलं आहे. मला त्यावेळी भाजपने ऑफर दिली होती. गोव्याच्या विधानसभेत बसण्याचे सांगितले होते. पंतप्रधान कार्यालयातून बोलावणं आलं होतं. त्यावेळच्या संरक्षणमंत्र्यांनीच मला दिल्लीला घेऊन गेले होते. त्यावेळी शिवसेना हा गरिबांचा पक्ष असल्याचे सांगितलं होतं. त्यामुळे सेनेसाठी काम करण्याचा निर्णय घेतला होता, असा खुलासाही केसरकर यांनी केला आहे.

Web Title: When will eknath shinde come to mumbai deepak kesarkar said nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2022 | 01:26 PM

Topics:  

  • C M Uddhav Thackeray
  • Deepak Kesarkar
  • Eknath Shinde
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Eknath Shinde News: लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकनाथ शिंदेचे सूचक विधान; म्हणाले…
1

Eknath Shinde News: लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकनाथ शिंदेचे सूचक विधान; म्हणाले…

Eknath Shinde On Thackeray: “हे तर कारस्थान करणारे…”; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना धू-धू धुतले
2

Eknath Shinde On Thackeray: “हे तर कारस्थान करणारे…”; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना धू-धू धुतले

Eknath Shinde Live: बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दसऱ्या मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा शब्द
3

Eknath Shinde Live: बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दसऱ्या मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा शब्द

Uddhav Thackeray Live : “शिवाजी पार्कवर चिखल, याला कारण कमळाबाई…”, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
4

Uddhav Thackeray Live : “शिवाजी पार्कवर चिखल, याला कारण कमळाबाई…”, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.