(फोटो सौजन्य - x अकाउंट)
रणवीर इलाहाबादियाला समय रैनाच्या ‘इंडिया गॉट लेटेंट’ शोमधील एका स्पर्धकाला विचारलेल्या चुकीच्या प्रश्नामुळे इंटरनेटवर केवळ टीकाच झाली नाही तर तो कायदेशीर अडचणीतही सापडला आहे. अक्षित सिंग नावाच्या एका व्यक्तीने बिअरबायसेप्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युट्यूबर आणि शोचे होस्ट समय रैना यांच्याविरुद्ध “अश्लीलतेला प्रोत्साहन दिल्याबद्दल” तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मोठ्या सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया आल्या समोर
रणवीर इलाहाबादिया यांच्या या विधानावर आता अनेक मोठ्या व्यक्तींच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी युट्यूबर-पॉडकास्टर रणवीर इलाहाबादिया यांनी समय रैनाच्या ‘इंडिया गॉट लेटेंट’ या शोमध्ये निर्माण केलेल्या वादावर भाष्य केले आणि म्हटले की देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे पण जेव्हा ते इतरांच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करते तेव्हा ते संपते.
रणवीर इलाहाबादिया यांच्यावर कारवाईची मागणी
देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितले की, “मला याबद्दल माहिती मिळाली आहे. मी अजून ते पाहिलेले नाही. गोष्टी चुकीच्या पद्धतीने सांगितल्या आणि सादर केल्या गेल्या आहेत. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, परंतु जेव्हा आपण इतरांच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करतो तेव्हा आपले स्वातंत्र्य संपते… आपल्या समाजात आपण काही नियम बनवले आहेत, जर कोणी त्यांचे उल्लंघन केले तर ते पूर्णपणे चुकीचे आहे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे.” असे त्यांनी सांगितले आहे.
#WATCH | Mumbai: On controversy over YouTuber Ranveer Allahbadia’s remarks on a show, Maharashtra CM Devendra Fadnavis says, “I have come to know about it. I have not seen it yet. Things have been said and presented in a wrong way. Everyone has freedom of speech but our freedom… pic.twitter.com/yXKcaWJWDD
— ANI (@ANI) February 10, 2025
गौरव तनेजा देखील संतापले
या वादावर भाष्य करणाऱ्यांपैकी, फ्लाइंग बीस्ट म्हणून प्रसिद्ध असलेले युट्यूबर गौरव तनेजा यांनी एक्स वर आपले मत व्यक्त केले आणि म्हटले, ” समय रैना संपूर्ण युट्यूब इंडिया रद्द करेपर्यंत थांबणार नाही असे दिसते.” असे लिहून त्यांनी त्याच्यावर संतापले आहे.
महुआ माजीने देखील मांडले मत
रणवीरच्या टिप्पणीवरील वादावर झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदार महुआ माजी म्हणतात, “हा एक प्रसिद्धीचा स्टंट आहे, त्यांना काही काळापूर्वी पंतप्रधानांकडून पुरस्कारही मिळाला होता, त्यांनी किमान त्याचा आदर करायला हवा होता… पालक आणि मुलांमधील नाते खूप पवित्र आहे, त्यावर अशा अश्लील टिप्पण्या करणे स्वीकारार्ह नाही. कठोर कारवाई झाली पाहिजे… संबंधित मंत्रालयाने कारवाई केली पाहिजे… अशा वेब सिरीज आहेत ज्या कुटुंबासह एकत्र पाहता येत नाहीत… ही केंद्र सरकार आणि संबंधित मंत्रालयाची जबाबदारी आहे… तरच त्यांच्यावर बंदी घालावी, तर ते धडा शिकतील…” असे त्यांनी ,म्हंटले आहे.