फोटो सौजन्य - Social Media
नक्की काय झाला संवाद?
या संवादादरम्यान सचिन खेडेकरांनी दिग्दर्शक महेश मांजरेकरांना सवाल केला की “तुम्ही मराठी तसेच हिंदी सिनेमे करता. गेल्या अनेक वर्षांपासून मराठी सिनेमांना थिएटर मिळत नाहीत असे आपण रडगाणे करतोय. आपल्यावर अन्याय होतो? यावर तुम्हाला काय वाटतं?” तेव्हा महेश मांजरेकर स्पष्ट शब्दात उत्तर देतात.
दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणतात की, “मला नाही वाटत हा अन्याय आहे. आपला सिनेमा चालला नाही तर प्रत्येक जण हेच म्हणतो की थिएटर मिळत नाही. लोकं सिनेमा पाहायला आले नाही म्हणजे नक्कीच सिनेमात काही कमतरता असेल. याच खापरं आपण थिएटरवर नाही फोडू शकत. नटसम्राट, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय तसेच काकस्पर्श हे देखील मराठी सिनेमेच होते आणि या सिनेमांना आफत शो मिळाले आहेत. तो थिएटरवाला बसलाय ना तिथे! त्याला बिजनेस करायचा आहे. जर सिनेमा चालणार तर तो नक्कीच शो वाढवणार.” इतकं सांगताना महेश मांजरेकरांनी मराठी Filmmakers ला मोलाचा संदेश दिला आहे. त्यांचं म्हणणं आहे की “मराठी सिनेमाने आता पुढे गेलं पाहिजे. कंटेन्ट तसा असेल तर प्रेक्षक नक्कीच दाद देतात. मराठी सिनेमांनी आपल्या बजेटला आता वाढवलं पाहिजे.” त्यांचे म्हणणे आहे की 3 कोटींच्या रकमेने 10 सिनेमे काढण्यापेक्षा 30 कोटींचा एकच सिनेमा काढा ना! OTT आल्यापासून सिनेमांचा एक दर्जा तयार झाला आहे आणि त्या दर्जाचे सिनेमे काढण्यामध्ये आपण कमी पडतोय.
महेश मांजरेकरांच्या या उत्तरावर अनेक मराठी प्रेक्षकांनी सहमती दाखवली आहे. तसेच महेश मांजरेकरांकडून एका उत्तम मराठी चित्रपटाची अपेक्षा वर्तवली आहे.






