काय म्हणाली जुई गडकरी ?
गेले तीन वर्ष ठरलं तर मग मालिका आजतागायत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. त्यामुळे या तीन वर्षात प्रियाचे सर्व कारनामे प्रेक्षकांना चांगलेच माहित झाले आहेत. आता तर प्रियाचं सत्य उघड झालं तर मग मालिका संपणार का ? असा प्रश्न जुईला विचारला. त्यावर जुई म्हणाली की, आता प्रियाचं पितळ उघड पडणार आहे आणि ते स्टार प्रवाहवरच्या तेरा नायिका मिळून करणार आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसातले हे एपिसोड प्रेक्षकांचं लक्ष वेधणार हे नक्की. यापुढे जुई असं देखील म्हणाली की, आता काहीच द्विस्ट नाहीये… प्रियाचं सत्य समोर आणण्यासाठीच आम्ही १३ जणी म्हणजेच १३ नायिका एकत्र आहोत. त्यामुळे आता प्रिया काही वाचणार नाही. तिला तिच्या पापाची शिक्षा मिळणार आहे. आमच्या सुभेदारांच्या घरातही सर्वांना समजणार आहे की, प्रिया काय आहे… तिने आजवर काय-काय केलंय. आता मी सांगू शकते The Wait Is Over!”
यालाच जोडून जुई पुढे असंही सांगते की, प्रियाचा चेहरा समोर आला म्हणजे मालिका बंद होणार नाही. अजून सर्वात महत्वाचा टप्पा बाकी आहे त्यामुळे मालिका संपणार नाही, असं स्पष्टीकरण जुईने दिलं आहे. प्रियाचं खोटं समोर आणण्यासाठी आता स्टार प्रवाह वाहिनीवरच्या तेरा नायिकांनी देखील पुढाकार
घेतला आहे. आता या नंतर मालिका काय नवं वळण घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
‘राजा शिवाजी’च्या निमित्ताने विकी कौशल आणि रितेश देशमुखची खास भेट; रंगली खास चर्चा






