जीवनशैलीत होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे आरोग्य बिघडून जाते. शरीरात खराब कोलेस्ट्रॉल आणि विषारी घटक तसेच साचून राहतात. शरीरात साचून राहिलेल्या विषारी घाणीमुळे आरोग्य बिघडण्यासोबतच पचनक्रिया सुद्धा बिघडते. गॅस, अपचन आणि पचनाच्या इतर समस्या उद्भवतात. त्यामुळे शरीर डिटॉक्स करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला दैनंदिन आहारात कोणत्या फळांचे सेवन केल्यास शरीरातील घाण बाहेर पडून जाईल, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती. (फोटो सौजन्य – istock)
शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात करा 'या' फळांचे सेवन, आजारांपासून राहाल दूर

सफरचंदांमध्ये विरघळणारे फायबर पेक्टिन आढळून येतात, ज्यामुळे आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. याशिवाय शरीरात वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी सफरचंद खावे.

पपईमध्ये पपेन नावाचे एंजाइम असते, जे पचनक्रिया सुधरण्यासाठी मदत करते. नियमित सकाळच्या नाश्त्यात वाटीभर पपई खाल्ल्यास पचनाची समस्या कधीच उद्भवणार नाही आणि पोट सुद्धा भरलेले राहील.

संत्र्यांमध्ये विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असते. यामध्ये असलेल्या घटकांमुळे पाचक रस वाढतो. शरीरातील मुक्त रॅडिकल्स आणि विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी संत्र्याचा रस किंवा संत्र खावे.

फायबर युक्त पेरूचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. दैनंदिन आहारात नियमित एक तरी पेरू खावा. पेरूमध्ये मोठ्या प्रमाणावर विटामिन सी आढळून येते.

डाळिंबाचा रस रक्त शुद्ध करतो आणि शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकतो. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नियमित एक डाळिंब खाणे. डाळिंबाच्या दाण्यांमध्ये असलेले लोह युक्त घटक शरीरात रक्त वाढवतात.






