उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, पक्ष सोडलेल्या 'त्या' नेत्याला पद न देण्याची मागणी
मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी पत्रव्यवहार करत आनंद परांजपे यांना म्हाडाचे उपाध्यक्षपद देऊ नये, अशी मागणी केली आय, असे सांगितले जात आहे. या पात्रात नमूद करण्यात दिल्यानुसार, आनंद परांजपे यांना म्हाडाचे उपाध्यक्षपद देऊ नये, त्याऐवजी आम्ही लवकरच दुसरे नाव सुचवू, असे या पत्रात नमूद करण्यात आल्याचे समजत आहे. यामुळेच या पत्राबाबत आता सगळीकडे चर्चा होताना दिसून येत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात आनंद परांजपे हे नाव खूपच चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ते नाराज असल्याच्या चर्चा होत होत्या. काही दिवसांपूर्वी म्हणजेच १४ मे रोजी आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदांचा तसेच पक्षाच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला होता. विधानपरिषदेचे तिकीट न मिळाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात होते. त्यानंतें त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. आणि काहीच दिवसांत त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पत्राद्वारे केलेल्या या मागणीवर आता मुख्यमंत्री फडणवीस काय ऍक्शन घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. याशिवाय शिवसेना शिंदे गट आणि आनंद परांजपे यांच्यादेखील यावर काय प्रतिक्रिया असणार याकडे सर्वांचे लक्ष असेल. दरम्यान आधीच विधान परिषदेच्या जागावाटपावरून नाराज असलेले महायुतीतील मित्रपक्ष आता काय भूमिका घेणार? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.






