31 हा जादुई आकडा गाठणे होते आवश्यक
जि.प.त कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तासमीकरण गुंतागुंतीचे बनले होते. सत्तेसाठी 31हा जादुई आकडा गाठणे आवश्यक होते. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) 18 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला, तर भाजपला 16जागा मिळाल्या, काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) यांचा आघाडीला पाठिंबा होता, तर शिंदे गट, अजित पवार गट तसेच लहान पक्ष किंगमेकरच्या भूमिकेत होते, भाजपने सत्ता मिळवण्यासाठी शिंदे गट आणि अजित पवार गटाचा पाठिंबा मिळवण्याचे शेवटपर्यंत प्रयत्न केले, संपर्क, दबाव आणि राजकीय हालचालींचा धडाका सुरू होता, मात्र स्थानिक पातळीवरील समीकरणे आणि आघाडीच्या नेत्यांची एकजूट यामुळे भाजपचे सर्व प्रयत्न अपुरे ठरले.






