स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी प्रसाद लाड यांनी विधीमंडळामध्ये केली (फोटो - सोशल मीडिया)
Swatantra Veer Savarkar Bharatratna : मुंबई : आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची (Swatantra Veer Savarkar) पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने सर्वांनी त्यांनी अभिवादन केले असून स्मृती जागवल्या आहेत. सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यामुळे विधीमंडळामध्ये देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या अशी मागणी करण्यात आली. याबाबत मागील अनेक वर्षांपासून मागणी केली जात आहे. याबाबत पहिल्यांदाच विधीमंडळामध्ये मागणी करण्यात आली आहे. (Maharashtra Politics)
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न द्या अशी मागणी राजकीय वर्तुळातून केली जात आहे. मागील अनेक वर्षांपासून हा मुद्दा नेत्यांच्या भाषणांमध्ये राहिला आहे. यावर पहिल्यांदाच विधीमंडळामध्ये बोलण्यात आले. राज्यामध्ये आणि देशामध्ये भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यां हिंदूत्वावादी विचारांचे सरकार आहे. मात्र अद्यापही भारतरत्न न दिल्यामुळे विरोधकांनी निशाणा साधला. यानंतर आता आज विधानपरिषदेत यासंदर्भात मागणी करण्यात आली हे. आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी आहे. त्यामुळे त्यांना भारतरत्न द्यावं, यासाठी आपण ठराव करावा आणि तो एकमताने संमत करून घ्यावा, अशी मागणी आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे.
हे देखील वाचा : बारामतीमध्ये रोहित पवारांची पोलिसांसोबत शाब्दिक चकमक; जीसीए, व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल नाहीच
आरएसएसच्या शतकोत्सवी कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी देखील विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्याबाबत वक्तव्य केले होते. त्यांना भारतरत्न दिल्यानंतर पुरस्काराचे महत्त्व वाढेल या आशयाचे वक्तव्य मोहन भागवत यांनी केले. याबाबत आता प्रसाद लाड यांनी विधीमंडळामध्ये भूमिका घेतली आहे. प्रसाद लाड म्हणाले की, भाजप नेते तथा आमदार प्रसाद लाड यांनी विधानपरिषदेत सावकरांना भारतरत्न देण्याबाबत मागणी केली आहे. स्वातंत्रवीर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा. संसदीय कार्यमंत्री यांनी असा प्रस्ताव हा केंद्र शासनाकडे पाठवावा, अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली आहे.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अद्वितीय क्रांतिकारक, प्रखर राष्ट्रभक्त, द्रष्टे विचारवंत आणि प्रभावी साहित्यिक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना मरणोत्तर “भारतरत्न” हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात यावा, ही नम्र व मनापासूनची विनंती विधान परिषदेच्या सभापतींना… pic.twitter.com/gDYzGR87D8 — Prasad Lad (@PrasadLadInd) February 26, 2026
हे देखील वाचा : अजित पवारांसारख्या नेत्यांच्या मृत्यूवर FIR का घेतला जात नाही? पोलीस दबावाखाली; रोहित पवारांचा संशय
प्रसाद लाड यांनी विधीमंडळामध्ये हा मुद्दा मांडल्यानंतर यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. बावनकुळे म्हणाले की, आम्ही हा ठराव सभापती महोदयांकडे मांडू आणि त्यांनतर आपण निर्णय घ्यावा, शासनाने प्रस्ताव आणावा लागेल. मी या परिषदेत असा प्रस्ताव आणतो पण तो सभागृहातही आणावा लागेल. त्यानंतर सभापती महोदय आपण निर्णय घ्यावा, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. त्यामुळे, महाराष्ट्र विधिमंडळातून आता सावरकरांच्या भारतरत्न पुरस्काराबाबत कार्यवाहीला सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे.






