ठाकरे गटाचे नेते उन्मेष पाटील हे शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहे (फोटो - सोशल मीडिया)
Unmesh Patil in Shinde group : मुंबई : संपूर्ण राज्यामध्ये होळीच्या आणि धुलिवंदनाच्या सणाचा मोठा उत्साह आहे. यामध्ये राजकीय वर्तुळात देखील हालचालींना वेग आला आहे. राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकत शिवसेना शिंदे गटामध्ये अधिकृत प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे. येत्या ६ मार्च रोजी जोरदार शक्ती प्रदर्शन करत शिंदेसेनेमध्ये पक्षप्रवेश करत आहे. या प्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
गेल्या काही दिवसांपासून उन्मेष पाटील यांच्या भूमिकेबाबत विविध तर्क-वितर्क रंगले होते. अखेर त्यांनी शिंदे गटाच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत नव्या राजकीय वाटचालीची सुरुवात केली. पक्षप्रवेश सोहळ्यात शिंदे गटातील वरिष्ठ नेते उपस्थित होते. पाटील यांनी राज्याच्या विकासासाठी आणि मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.
हे देखील वाचा : दुबईत अडकलेल्या भारतीयांना घेऊन पहिले विमान मुंबईत दाखल; पर्यटकांनी सांगितली थरारक आपबीती
छत्रपती संभाजीनगरच्या बँकेकडून उन्मेष पाटील यांच्या मालमत्तेची जप्तीची कारवाई सुरु आहे. ही कारवाई सुरु असताना त्यांनी सत्ताधारी महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आले आहे. उन्मेष पाटील यांनी 2024 च्या लोकसभेला भाजपकडून तिकीट नाकारल्यामुळे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. ठाकरेंच्या शिवसेनेकडून 2024 ला चाळीसगाव विधानसभा देखील लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला होता. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा अधिकृत प्रवेश होणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथील एका सहकारी बँकेने थकीत कर्जापोटी मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू केल्यानंतर त्यांच्या राजकीय भूमिकेत बदल झाल्याची चर्चा आहे.
हे देखील वाचा : काटोल येथील कंपनीत झालेल्या स्फोटप्रकरणी मोठी कारवाई; आत्तापर्यंत संचालकांसह 11 जणांना अटक
गेल्या महिन्यात त्यांनी श्रीकांत शिंदे यांची भेट घेत प्राथमिक चर्चा केली होती. २०१९ मध्ये भाजपच्या तिकिटावर लोकसभेत निवडून आलेल्या पाटील यांना २०२४ मध्ये उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांची सक्रियता कमी झाली होती. आता त्यांच्या शिंदेसेनेतील प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलण्याची चिन्हे आहेत.






