पराक्रमी आणि धाडसी सेनानी तात्या टोपे यांची जयंती आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
तात्या टोपे हे १८५७ च्या स्वातंत्र्यसमरातील पराक्रमी आणि धाडसी सेनानी होते. आज त्यांची जयंती आहे. त्यांचे मूळ नाव रामचंद्र पांडुरंग टोपे असे होते. ते नाना साहेब पेशवे यांचे निकटचे सहकारी होते. १८५७ च्या उठावात त्यांनी इंग्रजांविरुद्ध अनेक लढाया केल्या आणि आपल्या चातुर्यपूर्ण रणनितीने ब्रिटिश सैन्याला चकवले. कानपूर, झाशी आणि ग्वाल्हेर परिसरात त्यांनी स्वातंत्र्यासाठी जोरदार लढा दिला. राणी लक्ष्मीबाई यांच्यासोबत त्यांनी शौर्यपूर्ण युद्ध केले. त्यांच्या नेतृत्वाखालील गनिमी काव्याच्या तंत्रामुळे इंग्रजांना मोठा त्रास सहन करावा लागला. तात्या टोपे हे अत्यंत चिकाटीचे आणि राष्ट्रप्रेमी व्यक्तिमत्त्व होते. अखेर १८५९ साली इंग्रजांनी त्यांना पकडून फाशीची शिक्षा दिली. त्यांच्या बलिदानामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवी प्रेरणा मिळाली. तात्या टोपे यांचे योगदान भारतीय इतिहासात सदैव स्मरणात राहील. (Dinvishesh)
16 फेब्रुवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
16 फेब्रुवारी रोजी जन्म दिनविशेष
16 फेब्रुवारी रोजी मृत्यू दिनविशेष






