भारत वि पाकिस्तान सामना(फोटो-सोशल मीडिया)
हेही वाचा : Asia cup 2025 : Liton Das ने रचला इतिहास! मोडला शाकिब अल हसनचा विक्रम; T20 मध्ये केला ‘हा’ पराक्रम
भारताने गट टप्प्यात गट अ मध्ये अव्वल स्थान कायम ठेवून सुपर फोरसाठी पात्रता मिळवली आहे, तर पाकिस्तान दुसऱ्या स्थानावर राहून या टप्प्यात पोहोचला आहे. तथापि, सामना रद्द केल्याने भारतीय संघाला फारसा फायदा होण्याची शक्यता नाही. नियमांनुसार, अशा परिस्थितीत दोन्ही संघांना प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज दुबई येथे महामुकाबला होणार आहे. या सामन्या दरम्यान घाबरण्याची गरज नाही. सध्या यूएईमध्ये पावसाची शक्यता नसल्याची माहिती समोर आली आहे. क्रिकेट चाहत्यांना आता नियमांची ओळख देखील झाली आहे. युएईमध्ये हवामान पूर्णपणे स्वच्छ राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सरासरी तापमान सुमारे ३२ अंश सेल्सिअस इतके राहण्याची शक्यता आहे. ताशी १३ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा देखील अंदाज आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांकयातील सामना हा ठरलेल्या वेळेनुसार सुरू होण्याची जास्तीतजास्त शक्यता आहे.
हेही वाचा : IND vs PAK : पाकिस्तान संघ भारतीय भिंत भेदणार? तयार केला खास ‘मास्टरप्लॅन’; महामुकाबल्याची वाढली रंगत
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल/रिंकू सिंग, शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह
सैम अयुब, साहिबजादा फरहान, मोहम्मद हारिस (यष्टीरक्षक), फखर जमान, सलमान आगा (कर्णधार), खुशदिल शाह, हसन नवाज, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, अबरार अहमद.






