ललित मोदीचा वैभव सूर्यवंशीला मोठा प्रस्ताव (फोटो सौजन्य - X.com/Instagram)
ललित मोदींचे भावनिक ट्विट आणि मोठी घोषणा
Today, Vaibhav Sooryavanshi may have fallen four runs short of a century. But in my view, he achieved something far greater. He woke up an entire nation to what fearless young talent looks like. As someone who has always believed that sport must create opportunity, not just… pic.twitter.com/bvHADvIR6v — Lalit Kumar Modi (@LalitKModi) May 29, 2026
वैभवच्या निर्भय फलंदाजीने प्रभावित होऊन, ललित मोदींनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक लांब आणि भावनिक पोस्ट लिहिली. त्यांनी वैभवच्या कामगिरीचे वर्णन ‘धावांच्या पलीकडचे’ असे केले आणि त्याला जगभरात कुठेही मोफत शिक्षण घेण्यासाठी पूर्ण शिष्यवृत्तीची घोषणा केली. ललित मोदींनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, “आज वैभव सूर्यवंशी कदाचित शतक पूर्ण करण्यापासून चार धावा दूर राहिला असेल, पण माझ्या मते त्याने त्याहूनही मोठी गोष्ट साध्य केली आहे. एक निर्भय तरुण प्रतिभा म्हणजे काय असते, हे त्याने संपूर्ण देशाला दाखवून दिले आहे.”
वैभव सूर्यवंशीला दिला प्रस्ताव
ललित मोदींनी ट्विटमध्ये पुढे लिहिले, “खेळाने केवळ मनोरंजनच नाही तर संधीही निर्माण केल्या पाहिजेत, यावर माझा नेहमीच विश्वास राहिला आहे. त्यामुळे, जर वैभवला भविष्यात शिक्षण घेण्याची इच्छा झाली, तर मी त्याला जगातील कोणत्याही विद्यापीठात किंवा महाविद्यालयात पूर्ण शैक्षणिक शिष्यवृत्ती देऊ इच्छितो, ज्याचा संपूर्ण खर्च उचलला जाईल. हे त्याने केलेल्या धावांसाठी नाही. तर त्याने लाखो तरुण भारतीयांना दिलेल्या धैर्यासाठी, विश्वासासाठी आणि प्रेरणेसाठी आहे. प्रतिभेला शिक्षण आणि महानता यापैकी एकाची निवड करण्यास कधीही भाग पाडले जाऊ नये.”
वैभवने कमाल केली
आयपीएल २०२६ हे वैभव सूर्यवंशीसाठी एक स्वप्न होते. त्याने या हंगामात १६ सामन्यांमध्ये ७७६ धावा केल्या आणि ऑरेंज कॅपही जिंकली. त्याचा स्ट्राइक रेट २३० पेक्षा जास्त होता. संपूर्ण हंगामात निर्भयपणे फलंदाजी करत, वैभव आपल्या संघाला दुसरी आयपीएल ट्रॉफी जिंकून देण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता. मात्र गुजरात टायटन्सकडून हार पत्करावी लागल्यानंतर वैभव अत्यंत निराश झाला आणि त्याचे अनेक व्हिडिओही व्हायरल होत आहेत.
अवघ्या १५ वर्षांच्या या मुलाच्या खेळीने जगाला वेड लावलं आहे इतकं मात्र नक्की. केवळ वैभवसाठी राजस्थान रॉयलने जिंकावं अशीच सर्वांची अपेक्षा होती. मात्र वैभव, फरेरा आणि जडेजा वगळून कोणीही क्वालिफायरमध्ये चांगली कामगिरी करू शकले नाही आणि त्याचाच परिणाम टीम फायनलमध्ये पोहचू शकली नाही.
Vaibhav Suryvanshi चा नादच खुळा! नावावर केला ‘हा’ महारेकॉर्ड; ठरला पहिला भारतीय फलंदाज






