चिन्नास्वामी स्टेडियमबाहेरील चेंगराचेंगरीवर Virat Kohli ची भावुक पोस्ट..(फोटो-सोशल मीडिया)
Bangalore stampede : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ३ मे रोजी झालेल्या आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात पंजाबचा ६ धावांनी पराभव करत पहिले आयपीएल विजेतेपद जिंकले. बुधवारी या विजेतेपदाचा आनंद साजरा करण्यासाठी आरसीबी संघ बंगळुरूला रवाना झाला. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर आपल्या आवडत्या खेळाडूंना बघण्यासाठी हजारो चाहत्यांनी गर्दी केली होती. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला आणि ३३ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या अपघातानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. आता आरसीबीचा अनुभवी खेळाडू विराट कोहलीने देखील भावुक पोस्ट शेअर करून तो पूर्णपणे तुटल्याचे बोलला आहे.
विराट कोहलीने सोशल मीडियावर आरसीबीची अधिकृत पोस्ट शेअर करत लिहिले की या घटनेनंतर ‘मी पूर्णपणे तुटलो आहे आणि माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द नाहीत.’ या घटनेवर विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने देखील आरसीबीची पोस्ट शेअर करत एक हृदयद्रावक इमोजी टाकला आहे.
हेही वाचा : RCB Victory Parade Stampede: बंगळुरूत चाहत्यांचा मृत्यू पाहून सचिन तेंडुलकरचे तुटले मन, हळहळ केली व्यक्त
आरसीबीकडून या घटनेवर दुःख व्यक्त करण्यात आले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, आज दुपारी आमचा संघ स्टेडियममध्ये पोहोचताच आम्हाला मीडिया रिपोर्ट्सद्वारे स्टेडियमबाहेर घडलेल्या दुर्दैवी घटनेची माहिती मिळाली. हा आमच्यासाठी अत्यंत दुःखद आणि वेदनादायक क्षण आहे. या दुःखद घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल आरसीबी शोक व्यक्त करते आणि या अपघातामुळे दुःखी झालेल्या कुटुंबांबाबत संवेदना व्यक्त करते.
तसेच पुढे म्हटले की, आम्हाला हे स्पष्ट करायचे आहे की आम्हाला परिस्थितीची माहिती मिळताच, आम्ही आमच्या पूर्वनियोजित योजनांमध्ये आवश्यक बदल करून स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे आणि सूचनांचे पूर्णपणे पालन केले. आम्ही आमच्या सर्व चाहत्यांना आणि समर्थकांना त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून सतर्क राहण्याचे आवाहन करतो.या असे आरसीबीने म्हटले आहे.
हेही वाचा : RCB Vs PBKS : बेंगलुरु संघाच्या विजयानंतर इचलकरंजीत हुल्लडबाजी; पाेलिसांकडून साैम्य लाठीमार
𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗦𝘁𝗮𝘁𝗲𝗺𝗲𝗻𝘁: 𝗥𝗼𝘆𝗮𝗹 𝗖𝗵𝗮𝗹𝗹𝗲𝗻𝗴𝗲𝗿𝘀 𝗕𝗲𝗻𝗴𝗮𝗹𝘂𝗿𝘂
We are deeply anguished by the unfortunate incidents that have come to light through media reports regarding public gatherings all over Bengaluru in anticipation of the team’s arrival this… pic.twitter.com/C0RsCUzKtQ
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) June 4, 2025
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अपघाताबद्दल प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, पुरेशी सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करणे ही सरकारची जबाबदारी आहे. तसेच ते म्हणाले की, क्रिकेट असोसिएशनने परिस्थिती हाताळायला हवी होती. स्टेडियममध्ये फक्त एक छोटासा गेट उघडा होता, जिथे मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. गर्दी वाढताच लोकांनी जबरदस्तीने दरवाजा तोडला, ज्यामुळे चेंगराचेंगरीची घटना घडली. मुख्यमंत्र्यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची आर्थिक मदतीची घोषणा केली.