रोहित-विराटवर आश्विनचे भाष्य (फोटो- सोशल मिडिया)
रोहित विराटच्या खेळण्यावर आर आश्विनने केले भाष्य
संघाबहेर ठेवण्यासाठी निवडकर्त्यांसमोर असणार आव्हान
2027 मध्ये होणारे आयसीसी वर्ल्डकप स्पर्धा
Virat Kohli & Rohit Sharma: नुकतीच भारत अन् इंग्लंड यांच्यात वनडे सिरिज पार पडली आहे. या सिरिजमध्ये रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. लॉर्डसवरचा त्याचा म्हणजेच रोहित शर्मा त्याचा शेवटचा सामना खेळणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. बीसीसीआयने त्यावर भूमिका स्पष्ट केली होती. तसेच रोहितने देखील शानदार शतक लगावत आपण 2027 च्या वर्ल्डकपसाठी तयार असल्याचे दाखवून दिले आहे. आता आर. आश्विनने देखील यावर भाष्य केले आहे.
आर. आश्विनने विराट कोहली आणि रोहित शर्मावर भाष्य केले आहे. दोन्ही दिग्गज खेळाडू असून ते जोवर खेळू इच्छित आहेत, चांगले प्रदर्शन करत आहेत, तोवर त्यांना टीम इंडियाच्या बाहेर करणे कठीण आहे. दोन्ही खेळाडूंचे संघात असणे आणि त्यांच्या करोडो चाहत्यांचे समर्थन त्यांना अन्य खेळाडूंपेक्षा खास ठरवतात.
काय म्हणाला आर. आश्विन?
रोहित शर्मा आणि विराट कोहली भारतीय क्रिकेटमधील असे खेळाडू आहेत की यांना टीम इंडियाच्या बाहेर करण्याचा निर्णय कोणालाही कठीणच असणार आहे. विराट आणि रोहित पुढे खेळण्यास उत्सुक असतील तर त्यांना सहजपणे बाहेर करता येणार नाही. दोघांचे रेकॉर्डस उत्तम आहेत. रोहितच्या नावावर 12 हजार पेक्षा जास्त इंटरनॅशनल रन्स आहेत,. दोघांनी भारताला अनेक महत्वाच्या स्पर्धा सामने जिंकवून दिले आहेत. ते केवळ खेळाडू नाहीत तर करोडो चाहत्यांची अपेक्षा आहे.
भडका उडणार! India- Sri Lanka कसोटी मालिकेत जसप्रीत बुमराह खेळणार की नाही? बीसीसीआय लवकरच…
मोहम्मद शमीला संघात स्थान मिळाले नाही, किंवा सिराज अन् भुवनेश्वरला संघाबहेर ठेवले जाते तर कदाचित काही हजार लोक प्रश्न उपस्थित करतील. मात्र विराट आणि रोहितला बाहेर केल्यास मोठा फरक पडू शकतो. जर असा पाठिंबा गोलंदाजांना देखील मिळाला तर त्यांना देखील बाहेर करणे इतके सोपे नसते.
“हे सगळं काय आहे भाऊ..? Vaibhav Suryavanshi चा धुमाकूळ पाहून रविचंद्रन अश्विनही झाला अवाक
इंग्लंड सिरिजनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या भविष्याबाबत अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. टीम इंडियामध्ये युवा खेळाडूंना संधी देण्याची मागणी केली जात आहे. या दोन्ही खेळाडूंची संघातील जागा ही केवळ त्यांचे आकडे ठरवू शकत नाहीत. तर त्यांचे संघात असणे, अनुभव, प्रचंड लोकप्रियता हे देखील निवड प्रक्रियेत पहावे लागणार आहे.






