फोटो सौजन्य- सोशल मिडिया
Salman Ali Agha makes a big statement on captaincy : पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये काल सुपर ८ चा सामना पार पडला. या सामन्यांमध्ये पाकिस्तानच्या संघाला सामना जिंकून चांगला रन रेटने सेमी फायनलमध्ये जाण्याची संधी होती पण त्यांनी ती संधी गमावली. सुरुवातीला त्यांनी मोठी धावसंख्या उभारली पण त्यांचे गोलंदाज हे विकेट घेण्यात अपयशी ठरले. पाकिस्तानी सामन्यात जिंकला पण चांगला टिकून ठेवू शकले नाही त्यामुळे न्यूझीलंडच्या संघ सेमी फायनलसाठी पात्र ठरला आहे. पाकिस्तानच्या संघाने लीग सामन्यांमध्ये देखील प्रभावशाली कामगिरी केली नाही भारताच्या विरुद्ध ते पराभूत झाले होते त्याचबरोबर नेदरलँड विरुद्ध देखील ते शेवटच्या काही चेंडूनंतर विजय मिळवला होता.
आता सेमीफायनल मधून बाहेर झाल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार सलमान आणि आगाच्या कर्णधार पदावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. पाकिस्तानने त्यांच्या शेवटच्या सुपर ८ सामन्यात श्रीलंकेला हरवले पण सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडले. संघ पुन्हा एकदा बाद फेरीत स्थान मिळवण्यात अपयशी ठरला. सलमान अली आघा यांच्या नेतृत्वाखाली, संघाला या सामन्यात श्रीलंकेला १४७ धावांवर रोखण्याची आणि सेमीफायनलमध्ये आपले स्थान निश्चित करण्याची संधी होती परंतु संघाने ती हुकवली. टी२० विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर, सलमान अली आघा यांचे कर्णधारपदही धोक्यात आले आहे. संघाचे कर्णधारपद सोडण्याबाबत सलमानने पत्रकार परिषदेत स्वतः काय म्हटले ते आपण सांगूया.
AUS W vs IND W : हरमनप्रीतने नाणेफेक जिंकले, भारत करणार गोलंदाजी! वाचा दोन्ही संघाची Playing 11
पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने सलमान आघा यांना थेट प्रश्न विचारला: “तुम्हाला पाकिस्तानसाठी डमी कर्णधार वाटत आहे का? तुम्ही पाकिस्तानचे कर्णधारपद सोडत आहात की पीसीबीच्या निर्णयाची वाट पाहणार?” सलमान आघा यांनी उत्तर दिले, “मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही तर ते योग्य ठरणार नाही. जर मी हा निर्णय लगेच घेतला तर तो भावनिक निर्णय असेल. म्हणून, मी घरी जाऊन त्याबद्दल विचार करेन आणि नंतर माझ्या कर्णधारपदाचा निर्णय घेईन.”
Will captain Salman Agha step up for Pakistan with semi-final qualification on the line? pic.twitter.com/Tc327ggHTj — ESPNcricinfo (@ESPNcricinfo) February 28, 2026
पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्धचा सामना ५ धावांनी जिंकला, पण तरीही त्यांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २० षटकांत २१२ धावा केल्या. साहिबजादा फरहानच्या बॅटने पुन्हा एकदा संघासाठी गर्जना केली आणि त्याने जलद शतक झळकावले. उपांत्य फेरीत स्थान निश्चित करण्यासाठी पाकिस्तानला श्रीलंकेला १४७ धावांवर रोखणे आवश्यक होते, परंतु गोलंदाजांना अपयश आले. शेवटच्या षटकात श्रीलंका विजयाच्या अगदी जवळ पोहोचला, परंतु पंचांच्या पाठिंब्याने पाकिस्तानने सामना जिंकला.






