कुत्रे भुंकल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून चाकूने वार केल्याने दोघेजण जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना खोतवाडीतील आयोध्यानगर येथे घडली आहे.
घरातच १०० आणि ५०० रुपयांच्या बनावट नोटा छपाई प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने इचलकरंजीतील तीन तरुणांना अटक केली आहे. अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे.
कबनूर येथील रवी परीट यांच्या मालकीच्या खाेलीत बेकायदेशीरपणे विनपरवाना सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर शिवाजीनगर पाेलिसांनी छापा टाकला आहे. यामध्ये तीनपानी जुगार खेळणाऱ्या ९ जणांना ताब्यात घेतले आहे.
इचलकरंजीत जुगार अड्ड्यावर गावभाग पोलिसांनी छापा टाकला आहे. या कारवाईत १३ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, २ लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हा प्रकार रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याची माहिती शहापूर पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन गणेशला उपचारासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले.
अनेक नागरिक सर्रासपणे उघड्यावर कचरा टाकतात. या प्रकाराची प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यातूनच संबंधितांवर कारवाईची अभिनव संकल्पना पुढे आली आहे.
पोलीस उपअधिक्षक समिरसिंह साळवे यांनी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले, परंतु गुन्हा दाखल झाल्याशिवाय येथून हलणार नाही, असा पवित्रा घेत हिंदुत्ववाद्यांनी ठिय्या मारला.
आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात आरसीबीच्या संघाच्या विजयाप्रित्यर्थ इचलकरंजीत केलेल्या जल्लाेषाला गालबाेट लागले. काॅ. मलाबादे चाैकात मध्यरात्रीच्या सुमारास हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आहे.
प्रशांत दिलीप कुऱ्हाडे (वय ३२) याने आयुब अत्तार याच्या पाठीत धारधार चाकूने वार केला. तर प्रज्वल हळदकर, अमरनाथ जाधव यांच्यासह आलेल्या इतरांनी लाकडी दांडक्याने नौशाद मुजावर याच्यावर हल्ला केला.
इचलकरंजी शहरातील भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी उघड्यावर विक्री करण्यात येत असलेल्या मांसाहारी खाद्यपदार्थ विक्रीवर महापालिका प्रशासनाने बंदी घातली आहे.
आराेशी हिचे प्रणव पारखे याच्याशी प्रेमविवाह झाला हाेता. चार महिन्यांपूर्वी प्रणव याने गळास घेऊन आत्महत्या केली हाेती. त्या घटनेनंतर आराेशी ही काेल्हापूरहून आपल्या आई-वडिलांकडे तारदाळ येथे राहण्यास आली हाेती.
फसवणूकीची घटना कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांच्या हालचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शनिवारी पीडित मंडपे दाम्पत्याने पोलीस ठाण्याशी संपर्क साधून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
विकसित महाराष्ट्र 2047 अंतर्गत 2029 मध्ये उद्दीष्टांचा आराखडा केला जाईल. तर 2035 मध्ये राज्याला व जनतेला काय देणार हे निश्चित करुन त्यातून विकसित महाराष्ट्र निर्माण केला जाईल, असे फडणवीस म्हणाले.
संपत शिकलगार याची पत्नी राखी हिने २५ फेब्रुवारी रोजी विषारी द्रव्य प्राशन केल्याने उपचारासाठी प्रथम आयजीएम येथे तर पुढील उपचारासाठी सांगली सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.