अमरावती येथील सामान्य कुटुंबात भारती फुलमाळीचा जन्म झाला. तिचे वडील शिक्षण क्षेत्रात कार्यरत होते. वयाच्या १३ व्या वर्षापासून भारतीने फलंदाजीचे धडे गिरवण्यास सुरुवात केली.
नंदनी शर्माचा प्रवास थक्क करणारा आहे. तिची भारतीय संघात निवड झाल्याने संपूर्ण चंदीगडसह देशभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. 'डब्ल्यूपीएल २०२६' मुळे नंदिनी शर्मा खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली.