(फोटो सौजन्य: Pinterest)
कुठे फिरायला जायचं म्हटलं की, समुद्रकिनारा सर्वांच्या आवडीचा. त्यातही भारतातील बीच म्हटले की त्यात सर्वात पहिले गोवा हे नाव डोळ्यासमोर येते. गोव्याची सुंदरता संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. येथील समुद्रकिनारे देशातील सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहेत. इथे दर महिन्याला दूर दूर वरून पर्यटक येत असतात. मात्र तुम्हाला अनेकांना हे ठाऊक नाही की देशात आणखीन एक सुप्रसिद्ध आणि सुंदर समुद्रकिनाराही आहे ज्याचे नाव आशियातील टॉप 10 बीचेसमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. आम्ही TripAdvisor’s Travellers’ Choice Best of the Best 2025 च्या क्रमवारीबद्दल बोलत आहोत, ज्यामध्ये आशियातील सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
आम्ही आज तुम्हाला अशा एका बीचविषयी माहिती सांगत आहोत ज्याचे नाव आशियातील सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. हे बीच म्हणजे राधानगर बीच, जे अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये वसले आहे. हे येथील एक अद्भुत ठिकाण मानले जाते. आशियातील सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांच्या या यादीत पहिले स्थान फुकेत, थायलंड येथे स्थित केळी बीच आहे, त्यानंतर इंडोनेशियाचे केलेंगकिंग बीच, दक्षिण कोरियाचे हेउन्डे बीच आणि फिलिपाइन्सचे व्हाईट बीच आहे. आम्ही तुम्हाला देशातील सुंदर समुद्रकिनाऱ्यांबद्दल सांगत आहोत.
Holi 2025: बाजारातील रासायनिक रंग विसरा! नैसर्गिक पदार्थांपासून घरीच तयार करा 100% ऑर्गेनिक कलर्स
राधानगरी बीचला का देण्यात आलं हा किताब?
स्वराज बेटावर (पूर्वीचे हॅवलॉक बेट) असलेले राधानगर बीच, मऊ, पांढरा वालुकामय पृष्ठभाग, स्वच्छ नीलमणी पाणी आणि हिरव्यागार नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. इथले सौंदर्य इतके अद्भुत आहे की तुम्ही एकदा इथे भेट दिल्यास या जागेचे सौंदर्य सदा तुमच्या मनात भरून राहील. आशियातील टॉप 10 समुद्रकिना-यांमध्ये समाविष्ट झाल्यामुळे आज देशातील हा समुद्रकिनारा इतर देशांच्या समुद्रकिनाऱ्यांसोबत दिसतो. गोव्याच्या गजबजलेल्या समुद्रकिनाऱ्यांपेक्षा वेगळे, राधानगर बीच हा शांततेचा समुद्रकिनारा असल्याचे म्हटले जाते. तुम्ही येथे शांततामय वातावरणाचा अनुभव घेऊ शकता.
काय आहे इथे?
राधानगर बीचला फार कमी लोक ओळखता, इथे त्याच्या संवर्धनासाठी कठोर संवर्धनाचे प्रयत्न केले जात आहेत. हा समुद्रकिनारा सुमारे दोन किलोमीटर पसरलेला आहे, ज्यामुळे पर्यटक या ठिकाणच्या भव्यतेचा आनंद घेऊ शकतात. येथील पांढरी वाळू आणि हिरव्या पाण्याचा संगम या समुद्रकिनाऱ्याला एक सुंदर ठिकाण बनविण्यास मदत करते.
येथील स्वच्छ आणि निळे पाणी पोहण्यासाठी आणि स्नॉर्कलिंगसाठी योग्य आहे. हा समुद्रकिनारा वैविध्यपूर्ण सागरी जीवांचे घर आहे, ज्यामुळे तो स्नॉर्कलिंग आणि स्कूबा डायव्हिंग सारख्या ऍक्टिव्हिटीजसाठी स्वर्ग बनतो. एक चांगली गोष्ट म्हणजे इथले पाणी अगदी स्वच्छ आणि साफ असते. राधानगर बीचला ‘सनसेट पॉइंट ऑफ इंडिया’ असेही म्हटले जाते. सूर्यास्त होताच इथले आकाश केशरी, गुलाबी आणि जांभळे होते, हे दृश्य या ठिकाणची मजा आणखीनच वाढवते जे पाहण्यासाठी दूरदूरवरून लोक इथे येतात.
Holi 2025: केवळ भारतातच नाही या देशांमध्येही जल्लोषात साजरी केली जाते ‘होळी’
हवाई मार्गाने
जल मार्गाने
हॅवलॉक बेट ते राधानगर बीच