(फोटो सौजन्य: Instagram)
घडलं असं की, बायको सोडून जावयाला सासूच जास्त आवडली आणि त्याने थेट कोर्टात जाऊन सासूसोबतच लग्नगाठ बांधली. दावा केला जात आहे की, व्यक्तीचे त्याच्या सासूच्या साैंदर्यावर प्रेम जडले होते. हे एकतर्फी प्रेम नसून सासूलाही जावई आवडू लागला होता अशात नात्यांची चाैकट भेदून दोघांनी या नात्याला नवे नाव दिले. दोघांच्या विवाहासंबंधित व्हिडिओ आता सोशल मिडियावर वेगाने व्हायरल झाला असून ही घटना सध्या चांगलीच चर्चेत आहे. चला नक्की प्रकरण काय याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या कानपुर शहरातून सर्वांना हादरवणारी घटना समोर येत आहे. सांगितलं जात आहे की, सासू आणि जावयामधील जवळील पुढे इतकी वाढली की हे नातं प्रेमात रुपांतरीत झालं. इतकंच नाही तर दोघांनी नंतर लग्न करण्यचाही निर्णय घेतला. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये जावई आणि सासू दोघांनी गळ्यात वरमाला घातल्याचे दिसते. दोघांच्या हातात लग्नाचे प्रमाणपत्र दिसत आहे जो एक पुरावा आहे की त्यांनी अधिकृतपणे आपल्या नात्याला नवी ओळख दिली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच आता इंटरनेटवर चर्चेला उधाण आलं असून यूजर्सने नात्यांमधील मर्यादेविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत. दावा केला जात आहे की, दोघांनी कोर्ट मॅरेज केले असून दोघांसोबत ते आपला नवा संसार सुरु करण्याचा तयारीत आहेत.
View this post on Instagram
दरम्यान घटनेचा व्हिडिओ @balaprasad260 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘सासू जावयासोबत पळून गेली आणि त्या दोघांनी लग्न केले’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “हिंदू धर्माला बदनाम करण्याचा कट रचला जात आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अशांनी पाण्यात डुबुन मरायला हवं” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “आजकाल लोकांना लाज राहिली नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






