असीम मुनीरने बोलावली इमर्जन्सी मीटिंग (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
अफगाण तालिबानच्या हल्ल्यांच्या मालिकेने पाकिस्तानी सैन्याला हादरवून सोडले आहे. या हल्ल्यानंतर, विदेशी पाकिस्तानी लष्कर प्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी सोमवारी रात्री उशिरा रावळपिंडी येथील जनरल मुख्यालयात (GHQ) आपत्कालीन उच्चस्तरीय बैठक बोलावली. उच्च गुप्तचर सूत्रांनी CNN-News18 ला सांगितले की, डुरंड रेषेजवळील पाकिस्तानी चौक्यांवर तालिबानच्या हल्ल्यांनंतर ही बैठक बोलावण्यात आली होती. या हल्ल्यांमुळे पाकिस्तानी लष्कराच्या गुप्तचर आणि सीमा सुरक्षेतील कमकुवतपणा उघड झाला आहे.
कॉर्प्स कमांडर पेशावर लेफ्टनंट जनरल उमर अहमद बुखारी, सदर्न कमांड कमांडर लेफ्टनंट जनरल राहत नसीम अहमद खान, चीफ ऑफ जनरल स्टाफ (CGS) लेफ्टनंट जनरल मुहम्मद अवैस, DG ISI असीम मलिक, DGMI मेजर जनरल वाजिद अझीझ आणि DGMO मेजर जनरल काशिफ अब्दुल्ला यांच्यासह वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. गुप्तचर सूत्रांनुसार, असीम मुनीर अत्यंत संतप्त दिसले आणि त्यांनी त्यांच्या कमांडर्सना कठोरपणे विचारले, “आधी कोणतीही गुप्तचर माहिती का नव्हती? ही गुप्तचर यंत्रणांना अपयश कसे आले?” कंटिजन्स प्लान कुठे होता आणि का करण्यात आला नाही? सध्या पाकिस्तानमध्ये अत्यंत वाईट परिस्थिती दिसून येत आहे. सतत तालिबानी हल्ले होत असल्याचेही दिसून येत आहे.
मुनीर यांचा मोठा आदेश जारी
सूत्रांच्या माहितीनुसार, मुनीर यांनी याला एक मोठे धोरणात्मक अपयश म्हणून संबोधत प्रत्येक अधिकाऱ्याकडून या मोठ्या तालिबानी कारवाईची पूर्वसूचना का देण्यात आली नव्हती आणि बदला घेण्यासाठी तात्काळ तयारी का करण्यात आली नव्हती याचे उत्तर मागितले. त्यांनी सर्व वरिष्ठ कमांडरना सात दिवसांच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले, ज्यामध्ये सर्व कमतरता, कारणे आणि सुधारणात्मक उपाययोजना स्पष्टपणे मांडल्या आहेत. त्यांनी सीमावर्ती भागात दक्षता वाढविण्याचे आणि कोणताही संभाव्य हल्ला रोखण्यासाठी सर्व आघाड्यांवर अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना राबविण्याचे आदेश दिले.
तालिबानच्या हल्ल्याने हादरला पाकिस्तान
मुनीर म्हणाले की पाकिस्तान आता “अंतर्गत आणि बाह्य दोन्ही आघाड्यांवर युद्धाच्या स्थितीत आहे.” त्यांनी विचारले, “आपले सैनिक आणि नागरिक सतत बळी पडत असताना आपण किती काळ ‘सॉफ्ट स्टेट’ राहू?” आता कठोर कारवाई करण्याची वेळ आली आहे.” गुप्तचर सूत्रांनुसार, तालिबानने सात वेगवेगळ्या आघाड्यांवरून जोरदार तोफखाना हल्ले केले: अंगूर अड्डा, बाजौर, कुर्रम, दिर, चित्राल, वझिरिस्तान (खैबर पख्तूनख्वा), आणि बहराम चाह आणि चमन (बलुचिस्तान). या हल्ल्यांनी अचानक पाकिस्तानी स्थानांना लक्ष्य केले आणि सैन्याला आश्चर्यचकित केले.