"भारत-नेपाळ सीमेवर बालेन शाह यांची नाकेबंदी!" भारतीय वाहनांवर निर्बंध अन् १०० रुपयांच्या वस्तूंवरही टॅक्स ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Balen Shah Nepal India border news : भारत आणि नेपाळमधील ( India-Nepal Relation) ऐतिहासिक ‘रोटी-बेटी’च्या संबंधांमध्ये सध्या बालेन शाह सरकारच्या एका निर्णयामुळे मोठी मिठाची गुळी पडली आहे. नेपाळचे नवनियुक्त पंतप्रधान बालेन शाह यांनी सूत्रे हाती घेताच भारतीय सीमेवर अतिशय कडक नियम लागू केले आहेत. सीमा शुल्क (Customs) तपासणी नाक्यांवर नेपाळ पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक केली असून, भारतातून नेपाळमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वस्तूची आणि वाहनाची कसून तपासणी केली जात आहे. या निर्णयामुळे केवळ भारत-नेपाळ सीमावर्ती व्यापारच नाही, तर दोन्ही देशांतील सामाजिक संबंधही धोक्यात आले आहेत.
बालेन शाह सरकारने घेतलेल्या सर्वात वादग्रस्त निर्णयांपैकी एक म्हणजे सीमा शुल्कातील बदल. आता नेपाळमध्ये भारतातून आयात होणाऱ्या केवळ १०० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या वस्तूंवरही अनिवार्यपणे सीमा शुल्क आकारले जात आहे. यापूर्वी सीमावर्ती भागातील नागरिक किरकोळ घरगुती सामान, कपडे किंवा अन्नपदार्थ भारतीय बाजारपेठेतून विनाशुल्क आणत असत. मात्र, स्थानिक नेपाळी व्यापाऱ्यांचे नुकसान होत असल्याचा दावा करत सरकारने ही कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. यामुळे सीमेलगतच्या भारतीय बाजारपेठांमधील व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Uranium Crisis: ट्रम्पचा ‘युरेनियम दावा’ अवास्तव कल्पना; इराणने पुन्हा उघडपणे उडवली अमेरिकेची खिल्ली, कराराचेही केले खंडन
नेपाळच्या मधेश प्रांतात भारतीय नोंदणीकृत वाहनांच्या वाहतुकीवर अत्यंत कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. नेपाळी अधिकाऱ्यांच्या मते, हजारो भारतीय वाहने विनापरवाना नेपाळमध्ये वापरली जात आहेत. आता भारतीय वाहनांसाठी खालीलप्रमाणे दैनिक शुल्क आकारले जात आहे:
नियमांनुसार, भारतीय वाहनांना वर्षातून जास्तीत जास्त ३० दिवसच नेपाळमध्ये राहण्याची परवानगी आहे. मात्र, अनेक लोक एका दिवसाचा टॅक्स भरून महिनोन् महिने नेपाळमध्ये वाहने चालवत असल्याचे आढळले आहे. नेपाळ पोलिसांनी आता अशा वाहनांची धरपकड सुरू केली असून, यामुळे सामान्य नागरिक आणि राजकीय नेत्यांचीही अडचण झाली आहे.
In an unprecedented move, the newly formed #BalendraShah government in #Nepal has set up a five-member judicial panel to probe the assets of people who held public office from 2006 to the current fiscal year 2025-26, opening the widest scrutiny yet of the country’s post-monarchy… pic.twitter.com/7zCYkIpkR2 — The Times Of India (@timesofindia) April 17, 2026
credit – social media and Twitter
बालेन शाह यांच्या या निर्णयामुळे नेपाळमध्ये राजकीय वादळ उठले आहे. सीपीएन-यूएमएल (CPN-UML), राष्ट्रीय प्रजातंत्र पक्ष आणि जनता समाजवादी पक्षासारख्या बलाढ्य राजकीय पक्षांनी या कारवाईचा निषेध केला आहे. १२ एप्रिल रोजी प्रसिद्ध केलेल्या एका संयुक्त निवेदनात या पक्षांनी मागणी केली की, सीमेच्या ३० किलोमीटरच्या परिघात भारतीय वाहनांना मुक्तपणे फिरण्याची परवानगी द्यावी. निवडणुकांच्या काळात मधेशी भागातील राजकीय पक्ष प्रचारासाठी मोठ्या प्रमाणावर भारतीय वाहनांवर अवलंबून असतात, त्यामुळे हा निर्णय शाह यांनी विरोधी पक्षांची ताकद कमी करण्यासाठी घेतला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Update : एक मत अन् ठरलं जगाचं भवितव्य! रिपब्लिकनचा डेमोक्रॅट्सवर प्रहार; इराण युद्धावरून अमेरिका दोन भागात विभागली
नेपाळच्या सुरक्षा यंत्रणांचा दावा आहे की, भारतीय क्रमांकाची वाहने गुन्हेगारी कृत्य, चोरी आणि अमली पदार्थांच्या तस्करीसाठी वापरली जातात. एकदा हे वाहन नेपाळबाहेर गेले की त्याचा मागोवा घेणे कठीण होते, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने पाळत ठेवणे आवश्यक आहे. सर्लाहीचे मुख्य जिल्हा अधिकारी रामुराज कडरिया यांनी स्पष्ट केले की, “आम्ही केवळ कायद्याची अंमलबजावणी करत आहोत, सीमा शुल्क न भरता वाहन चालवणे बेकायदेशीर आहे.” मात्र, या निर्णयामुळे नेपाळमधील सर्वसामान्यांचे हाल होत असून, सीमेवरील तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Ans: नेपाळमध्ये चारचाकीसाठी ₹६००, तीनचाकीसाठी ₹४०० आणि मोटारसायकलसाठी ₹२०० प्रति दिन इतका कर भरावा लागतो.
Ans: आता भारतातून नेपाळमध्ये आणल्या जाणाऱ्या १०० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रत्येक वस्तूवर सीमा शुल्क भरणे अनिवार्य केले आहे.
Ans: भारतीय नोंदणीकृत वाहने वर्षातून जास्तीत जास्त ३० दिवस नेपाळमध्ये राहू शकतात आणि प्रत्येक दिवसासाठी त्यांना शुल्क भरावे लागते.






