इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इराणच्या परराष्ट्र मंत्रालायचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी सोमवारी (२० जुलै) पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले की, इराण आपल्या राष्ट्रीय हिंताचे रक्षण करण्यासाठी राजनैतिक आणि संरक्षणात्मक अशा दोन्ही मार्गांचा वापर करेल. युद्ध आणि कुटनीती दोन्ही पर्याय आम्ही वापरत आहोत असे इस्माईल बघाई यांनी स्पष्ट केले.
बघाई यांनी अमेरिकेसोबतच्या १४ कलमी सामंजस्य कराराबाबतही महत्त्वपूर्ण विधान केले. त्यांनी म्हटले की, या करारत कोणतीही संदिग्ध अट नव्हती, सर्व बाबी स्पष्टपणे नमूद करण्यात आल्या होत्या. यामुळे हा करार मोडण्यासाठी अमेरिकेकडो कोणतेही योग्य कारण नाही.
त्यांच्या मते, सामंजस्य करारातील अटी दोन्ही देशांना मान्य होत्या. आम्ही सुरुवातीलाच होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचा ताबा राहिल हे स्पष्ट केले होते. यावर ओमान आणि प्रादेशिक देशांशी चर्चा सुरु ठेवली जाईल असेही स्पष्ट करण्यात आले होते, असे बघाई यांनी नमूद केले.
मात्र, दोन्ही देशांत ६० दिवसांच्या युद्धबंदीची घोषणा करण्यात आल्यानंतर काही दिवसानंतर करार मोडकळीस आला. होर्मुझमध्ये जहाजांवर इराणच्या हल्ल्याविरोधात अमेरिकेने लष्करी कारवाई सुरु केली. अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांमुळे इराण आणखी पेटून उठला आणि मध्यपूर्वेतील अमेरिकी लष्करी तळांवर लक्ष्य करण्यास सुरुवात केली. सध्या आखाती देशांमध्ये तणाव वाढला असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे.
अशा परिस्थितीत संवादाचे मार्ग खुल ठेवण्याची इराणने भूमिका घेतल्याने राजनैतिक चर्चा पुन्हा सुरु होऊन तणाव निवळण्याची आशा व्यक्त केली जात आहे. परंतु अमेरिकेकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. यामुळे संपूर्ण जग अमेरिकेकेड नजर टिकवून आहे.






