US Iran Peace Talks : इराणचा झुकण्यास नकार...; अयशस्वी शांतता चर्चेसाठी अमेरिकलाच धरले जबाबदार, मध्यपूर्वेत पुन्हा हाहा:कार माजणार (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इराणच्या मते, अमेरिकेने चर्चेत अत्यंत जाचक आणि कठोर अटी ठेवल्या होत्या, ज्यावर इराण (Iran) एकमत होणे अशक्य होते. इराणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अमेरिकेची भूमिका अत्यंत ताठर होती. मागण्यांमध्ये संतुलन नव्हते, ज्यामुळे कोणताही ठोस निर्णय होऊ शला नाही. इराणने अमेरिकेसमोर झुकण्यास स्पष्टपण नकार दिला आहे. तसेच इराण आपल्या अटींवर ठाम असल्याचे म्हटले आहे.
शनिवारी (११ एप्रिल) पाकिस्तानच्या मध्यस्थीने अमेरिका आणि इराणच्या शिष्टमंडळात वाटाघाटी चर्चा सुरु झाली होती. यामध्ये अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्त्व हे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी वेंस करत होते. तर इराणच्या शिष्टमंडळाचे नेतृत्त्व संसदेचे सभापती मोहम्मद बागेर गालिफब यांच्याकडे होते. दरम्यान दोन्ही देशांमध्ये जवळपास २१ तासांची प्रदीर्घ चर्चा पार पाडली. मात्र ही चर्चा असफल ठरली आहे.
दरम्यान रविवारी (१२ एप्रिल) सकाळी जेडी वेंस यांनी एका पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. यावेळी त्यांनी म्हटले की, गेल्या २१ तासांपासून इराणशी शांतात करार करण्याचा प्रयत्न सुरु होता. दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींवर संवाद साधण्यात आला. परंतु आम्ही कोणत्याही ठोस निकालापर्यंत पोहोचू शकलो नाही. ही बातमी अमेरिकेसाठी जास्त धक्कादायक असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच त्यांनी इराणने अमेरिकेच्या अटी मान्य करण्यास नकार दिला असून आम्ही अमेरिकेला परत चाललो असल्याचे म्हटले.
#WATCH | US-Iran peace talks | Islamabad, Pakistan: US Vice President JD Vance says, “…The bad news is that we have not reached an agreement. I think that is bad news for Iran much more than it’s bad news for the USA. So, we go back to the US having not come to an… pic.twitter.com/jWHpJYemYz — ANI (@ANI) April 12, 2026
याशिवाय वेंस यांनी पाकिस्तानचेही आभार मानले. त्यांनी म्हटले की, हा वाटाघाटी करार होऊ शकला नाही याची खंत आहे, परंतु यासाठी पाकिस्तान (Pakistan) जबाबदार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पाकिस्तानने उत्कृष्ट भूमिका निभावली. त्यांनी दोन्ही बाजूंचे मतभेद मिटवण्याचा आणि शांतता करार घडवून आणण्याचा मनापासून प्रयत्न केला असे वेंस यांनी म्हटले.
ही वाटाघाटी चर्चा अपयशी ठरल्यामुळे मध्यपूर्वेत पुन्हा एकदा अस्थिरता निर्णाय होण्याची शकय्ता आहे. दोन्ही देश एकमत झाले नाही तर या भागात अशांतात प्रस्थापित होऊ शकते याचा सर्वात मोठा धोका हा आखाती देशांना आहे. इराणने चर्चेपूर्वी दिलेल्या धमकीनुसार, अमेरिकेन अटी मान्य न केल्यास मध्यपूर्वेतील आखाती देशांवर हल्ले होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.






